शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:34 IST

China-India Relation News: चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे.

चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे. त्यात चिनी नागरिकांना भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भारतामध्ये अवैधपणे प्रवेश केल्यास कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असेही चिनी दूतावासाने म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, भारत आणि नेपाळने सीमावर्ती भागांमध्ये गस्त आणि शोधमोहीम खूप वाढवली आहे. असं असतानाही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही चिनी नागरिक हे भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ जात आहेत. हल्लीच असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. ज्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

या रिपोर्टनुसार चीनकडून सांगण्यात आले की, भारत आणि नेपाळ यांच्यामधील सीमा खुली आहे. इथे सीमाभाग दर्शवणाऱ्या खाणाखुणा खूपच कमी आहेत. येथून नेपाळी आणि भारतीय नागरिक आपलं ओळख पत्र दाखवून सीमा पार करू शकतात. मात्र परदेशी नागरिकांना वैध व्हिसा असल्याशिवाय या सीमेवरून भारतामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आहे. अशा परिस्थितीत जर कुणी नागरिकाने चुकून भारताची सीमा पार केली, तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

चीनने सांगितले की, भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेशाबाबतचे कायदे कठोर आहेत. तसेच या परिस्थितीत दोषी व्यक्तीला २ ते आठ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच येथे अनावधानाने जरी प्रवेश केला. तरी अटकेची कारवाई होऊन खटला चालू शकतो. तसेच या स्थितीत दोषी व्यक्तीला २ ते ८ वर्षांचा तुरुंगवास आणि जबर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यात जामिन देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच कुठल्याही आणिबाणीच्या परिस्थितीत चिनी नागरिकांनी त्वरित नेपाळमधील दूतावासाशी संपर्क साधावा, असं आवाहनही चीनकडून करण्यात आलं आहे.   

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNepalनेपाळ