शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:34 IST

China-India Relation News: चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे.

चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे. त्यात चिनी नागरिकांना भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भारतामध्ये अवैधपणे प्रवेश केल्यास कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असेही चिनी दूतावासाने म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, भारत आणि नेपाळने सीमावर्ती भागांमध्ये गस्त आणि शोधमोहीम खूप वाढवली आहे. असं असतानाही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही चिनी नागरिक हे भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ जात आहेत. हल्लीच असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. ज्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

या रिपोर्टनुसार चीनकडून सांगण्यात आले की, भारत आणि नेपाळ यांच्यामधील सीमा खुली आहे. इथे सीमाभाग दर्शवणाऱ्या खाणाखुणा खूपच कमी आहेत. येथून नेपाळी आणि भारतीय नागरिक आपलं ओळख पत्र दाखवून सीमा पार करू शकतात. मात्र परदेशी नागरिकांना वैध व्हिसा असल्याशिवाय या सीमेवरून भारतामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आहे. अशा परिस्थितीत जर कुणी नागरिकाने चुकून भारताची सीमा पार केली, तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

चीनने सांगितले की, भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेशाबाबतचे कायदे कठोर आहेत. तसेच या परिस्थितीत दोषी व्यक्तीला २ ते आठ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच येथे अनावधानाने जरी प्रवेश केला. तरी अटकेची कारवाई होऊन खटला चालू शकतो. तसेच या स्थितीत दोषी व्यक्तीला २ ते ८ वर्षांचा तुरुंगवास आणि जबर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यात जामिन देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच कुठल्याही आणिबाणीच्या परिस्थितीत चिनी नागरिकांनी त्वरित नेपाळमधील दूतावासाशी संपर्क साधावा, असं आवाहनही चीनकडून करण्यात आलं आहे.   

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNepalनेपाळ