शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ठरवा'; नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:14 IST

नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत.

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड आणि मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही न मागता, त्यांना देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे, असं नाना पाटेकर म्हणाले. शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा नाशिक येथे ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नाना पाटेकर बोलत होते. यावेळी पाटेकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. 

नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत. आता सरकारकडे काही मागू नका. आता कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा. मी राजकारणात जाऊ शकत नाही कारण माझ्या पोटात जे असेल ते तोंडावर येईल. ते माझी पक्षातून हकालपट्टी करतील. पक्ष बदलल्याने महिनाभरात सर्व पक्ष संपुष्टात येतील. इथे आम्ही तुमच्यासमोर म्हणजे, आमच्या शेतकरी बांधवांसमोर मनापासून बोलू शकतो, असं नाना पाटेकर यांनी सांगितले. 

'मी शेतकरी म्हणून जन्म घेईन'

शेतकऱ्यांशी संवाद साधताना नाना पुढे म्हणाले, मी आत्महत्या केली तरी शेतकरी म्हणून जन्म घेईन, शेतकरी कधीच म्हणणार नाही की मला शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. आम्हाला जनावरांची भाषा कळते, शेतकऱ्यांची भाषा वेळेत कशी बोलावी हे कळत नाही का?, असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. 

१० मार्च रोजी 'ट्रेन रोको'-

शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना ६ मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. शेतकरी आंदोलकांनी १० मार्च रोजी 'ट्रेन रोको' आंदोलनाची घोषणाही केली आहे. तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरFarmers Protestशेतकरी आंदोलनMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार