शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

'आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ठरवा'; नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:14 IST

नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत.

देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड आणि मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही न मागता, त्यांना देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे, असं नाना पाटेकर म्हणाले. शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा नाशिक येथे ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नाना पाटेकर बोलत होते. यावेळी पाटेकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. 

नाना पाटेकर यावेळी शेतकऱ्यांची बाजू घेत ते म्हणाले की, पूर्वी ८०-९०% शेतकरी होते, आता ५०% शेतकरी आहेत. आता सरकारकडे काही मागू नका. आता कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा. मी राजकारणात जाऊ शकत नाही कारण माझ्या पोटात जे असेल ते तोंडावर येईल. ते माझी पक्षातून हकालपट्टी करतील. पक्ष बदलल्याने महिनाभरात सर्व पक्ष संपुष्टात येतील. इथे आम्ही तुमच्यासमोर म्हणजे, आमच्या शेतकरी बांधवांसमोर मनापासून बोलू शकतो, असं नाना पाटेकर यांनी सांगितले. 

'मी शेतकरी म्हणून जन्म घेईन'

शेतकऱ्यांशी संवाद साधताना नाना पुढे म्हणाले, मी आत्महत्या केली तरी शेतकरी म्हणून जन्म घेईन, शेतकरी कधीच म्हणणार नाही की मला शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. आम्हाला जनावरांची भाषा कळते, शेतकऱ्यांची भाषा वेळेत कशी बोलावी हे कळत नाही का?, असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. 

१० मार्च रोजी 'ट्रेन रोको'-

शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना ६ मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. शेतकरी आंदोलकांनी १० मार्च रोजी 'ट्रेन रोको' आंदोलनाची घोषणाही केली आहे. तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरFarmers Protestशेतकरी आंदोलनMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार