शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

देशांतर्गत विक्रीमुळे भारत जागतिक मंदीपासून सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 07:32 IST

जागतिक बँकेचे अध्यक्ष बंगा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : देशांतर्गत विक्रीमुळे भारतीयअर्थव्यवस्था जागतिक मंदीपासून सुरक्षित राहिली आहे, कारण भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा देशांतर्गत मागणीवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी बुधवारी केले.

भारताच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या जी-२० देशांच्या बैठकीनिमित्त बंगा हे येथे आले आहेत. त्यानिमित्त त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, जी-२० परिषदेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आम्ही विचारविनिमय केला. याशिवाय जागतिक बँक व भारत यांच्यातील सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवरही आम्ही चर्चा केली.  बंगा यांनी सांगितले की, सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत मंदीशी संबंधित जोखीम कायम राहणार आहे. मात्र, भारताच्या जीडीपीचा मोठा हिस्सा देशांतर्गत विक्रीतून येत असल्यामुळे या संकटापासून भारत सुरक्षित राहील. देशांतर्गत मागणीने भारताला मंदीच्या संकटापासून दूर ठेवण्याचे काम केले आहे. गांधीनगरमध्ये जी-२० देशांचे वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांची बैठक संपन्न झाली. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या बहुपक्षीय विकास संस्थांच्या भूमिकेबाबत बैठकीत चर्चा झाली.

कोविड काळातील आव्हानांचा केला मजबुतीने मुकाबलादिल्लीच्या दौऱ्यात बंगा यांनी एका कौशल्य विकास केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोविड साथीच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांचा भारताने मजबुतीने मुकाबला केला. त्यासाठी अनेक उपाय योजना केल्या. ही गती पुढेही कायम ठेवणे आवश्यक आहे.

टॅग्स :World Bankवर्ल्ड बँकIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था