डोंबिवलीत बांगलादेशी गुन्हेगारांना अटक
By Admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:37+5:302014-09-07T00:04:37+5:30
घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर

डोंबिवलीत बांगलादेशी गुन्हेगारांना अटक
घ सखोरांचा प्रश्न ऐरणीवर..................डोंबिवली - उसरघर येथे २७ ऑगस्ट रोजी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून, तो बांगलादेशी घुसखोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोसिलांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. हे सर्व मारेकरीही बांगलादेशी घुसखोर असल्याचे तपासात उघड झाल्याने शहरातील घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़मानपाडा परिसरातील उसरघर गावाच्या हद्दीत २७ ऑगस्ट रोजी एक मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या उजव्या दंडाला असलेल्या ताईतावरून आणि अन्य काही खुणांवरून तो बांगलादेशी असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानुसार बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य असलेल्या भागांत शोध घेण्यात आला आणि मोहन उर्फ सनातन बरमन (२८), बबलू चौरसीया (३२) आणि युनूस अकमल शेख (२९) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यातून या तिघांनी नुरजमाल हबीबुल मुल्ला (२६) याची हत्या केल्याचे उघड झाले. आरोपी मोहन हा बारमध्ये तरुणी पुरविण्याचा धंदा करत असून त्याच्याकडे कामाला असलेल्या ब्युटी खातून उर्फ बिना अब्दुल कासम मडोल हिच्याशी नुरजमालने विवाह केला होता. त्यामुळे मोहनच्या धंद्यावर परिणाम झाला होता़ या रागातून त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने नुरजमालची हत्या केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी मोहनसह बबलू आणि युनूस या तिघांना अटक करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करून भारतात राहणार्या ब्युटी खातूनवरही कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.(प्रतिनिधी)