शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

हे सत्य माहिती आहे का? चार वर्षांत 18 राज्यांमध्ये निवडणुका, भाजपाला पाच राज्यांमध्येच बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:15 IST

केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे.

नवी दिल्ली:  गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपाने विजयी पताका फडकावल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, या सगळ्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकल्यास एक वेगळेच सत्य समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्या पाठिशी लोकाश्रय असल्याचा दावा केला होता. केंद्रातच नव्हे, तर तब्बल २० राज्यांत आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचा पूर्ण पाठिंबा लाभला आहे, हे सिद्धच होते, असे मोदींनी म्हटले होते. परंतु आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील 4139 विधानसभेच्या जागांपैकी फक्त 1516 जागांवर (37 टक्के) भाजपाची सत्ता आहे. यापैकी 950 जागा  या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यामुळे भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली हे खरे असले तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. मे 2015 पासून  झालेल्या 18 निवडणुकांमध्ये फक्त पाच राज्यांमध्येच भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली आहे. उर्वरित सहा राज्यांमध्ये भाजपाने मित्रपक्षांची मोट बांधून सत्ता हस्तगत केली आहे. तर अन्य सात राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी सरकार स्थापन केले आहे. सध्याच्या घडीला 29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये 2013 पासूनच भाजपाची सत्ता आहे. यामध्येही फक्त 10 राज्यांमध्येच भाजपाकडे बहुमत आहे. तर सिक्कीम, मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय भाजपाची कामगिरी शून्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपाचे केवळ 9 आमदार आहेत. केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 3, पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 9, तेलंगणात 119 पैकी 5 आणि दिल्लीत 70 पैकी केवळ 3 जागांवरच भाजपाचे आमदार आहेत. तर ओदिशा आणि नागालँड विधानसभेत भाजपाकडे अनुक्रमे 10 आणि 12 जागा आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस