शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हे सत्य माहिती आहे का? चार वर्षांत 18 राज्यांमध्ये निवडणुका, भाजपाला पाच राज्यांमध्येच बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:15 IST

केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे.

नवी दिल्ली:  गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपाने विजयी पताका फडकावल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, या सगळ्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकल्यास एक वेगळेच सत्य समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्या पाठिशी लोकाश्रय असल्याचा दावा केला होता. केंद्रातच नव्हे, तर तब्बल २० राज्यांत आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचा पूर्ण पाठिंबा लाभला आहे, हे सिद्धच होते, असे मोदींनी म्हटले होते. परंतु आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील 4139 विधानसभेच्या जागांपैकी फक्त 1516 जागांवर (37 टक्के) भाजपाची सत्ता आहे. यापैकी 950 जागा  या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यामुळे भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली हे खरे असले तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. मे 2015 पासून  झालेल्या 18 निवडणुकांमध्ये फक्त पाच राज्यांमध्येच भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली आहे. उर्वरित सहा राज्यांमध्ये भाजपाने मित्रपक्षांची मोट बांधून सत्ता हस्तगत केली आहे. तर अन्य सात राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी सरकार स्थापन केले आहे. सध्याच्या घडीला 29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये 2013 पासूनच भाजपाची सत्ता आहे. यामध्येही फक्त 10 राज्यांमध्येच भाजपाकडे बहुमत आहे. तर सिक्कीम, मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय भाजपाची कामगिरी शून्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपाचे केवळ 9 आमदार आहेत. केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 3, पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 9, तेलंगणात 119 पैकी 5 आणि दिल्लीत 70 पैकी केवळ 3 जागांवरच भाजपाचे आमदार आहेत. तर ओदिशा आणि नागालँड विधानसभेत भाजपाकडे अनुक्रमे 10 आणि 12 जागा आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस