शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

हे सत्य माहिती आहे का? चार वर्षांत 18 राज्यांमध्ये निवडणुका, भाजपाला पाच राज्यांमध्येच बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:15 IST

केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे.

नवी दिल्ली:  गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपाने विजयी पताका फडकावल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, या सगळ्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकल्यास एक वेगळेच सत्य समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्या पाठिशी लोकाश्रय असल्याचा दावा केला होता. केंद्रातच नव्हे, तर तब्बल २० राज्यांत आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचा पूर्ण पाठिंबा लाभला आहे, हे सिद्धच होते, असे मोदींनी म्हटले होते. परंतु आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील 4139 विधानसभेच्या जागांपैकी फक्त 1516 जागांवर (37 टक्के) भाजपाची सत्ता आहे. यापैकी 950 जागा  या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यामुळे भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली हे खरे असले तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. मे 2015 पासून  झालेल्या 18 निवडणुकांमध्ये फक्त पाच राज्यांमध्येच भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली आहे. उर्वरित सहा राज्यांमध्ये भाजपाने मित्रपक्षांची मोट बांधून सत्ता हस्तगत केली आहे. तर अन्य सात राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी सरकार स्थापन केले आहे. सध्याच्या घडीला 29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये 2013 पासूनच भाजपाची सत्ता आहे. यामध्येही फक्त 10 राज्यांमध्येच भाजपाकडे बहुमत आहे. तर सिक्कीम, मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय भाजपाची कामगिरी शून्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपाचे केवळ 9 आमदार आहेत. केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 3, पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 9, तेलंगणात 119 पैकी 5 आणि दिल्लीत 70 पैकी केवळ 3 जागांवरच भाजपाचे आमदार आहेत. तर ओदिशा आणि नागालँड विधानसभेत भाजपाकडे अनुक्रमे 10 आणि 12 जागा आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस