शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

बंकर बस्टर बॉम्ब नेण्याची भारताकडेही क्षमता?, अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:31 IST

डीआरडीओ ही संस्था तयार करत असलेल्या अग्नि-५च्या सुधारित आवृत्तीचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जमिनीखालील ८० ते १०० मीटरपर्यंत खोलवर असलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते.

नवी दिल्ली : अमेरिकेने  फोर्डो अणुकेंद्रावर जीबीयू-५७/ए या प्रचंड बंकर बस्टर बॉम्बने हल्ले केले. त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाचे खूप मोठे नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत हा अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती विकसित करत आहे. या क्षेपणास्त्रात सात हजार किलो वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असणार आहे.

डीआरडीओ ही संस्था तयार करत असलेल्या अग्नि-५च्या सुधारित आवृत्तीचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जमिनीखालील ८० ते १०० मीटरपर्यंत खोलवर असलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र बंकरखालील मजबूत संरचनांवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. इराणविरोधात अमेरिकेने वापरला तसा बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्यासाठी भारत क्षेपणास्त्र बनवित आहे.

शक्तिशाली प्रणाली

पाकिस्तान, चीनसारख्या देशांतील क्षेपणास्त्र तळ व संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी अग्नि-५च्या बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेणाऱ्या सुधारित आवृत्त्या खूप उपयोगी ठरतील असे संरक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या बंकर बस्टर प्रणालींहून शक्तिशाली असतील.

अमेरिकेच्या युद्धनीतीचे अनुकरण

बदललेल्या युद्धनीतीनुसार अमेरिका बंकर बस्टरसारख्या गोष्टींचा उपयोग करून अचूक लक्ष्यभेद करते. अशा प्रकारे संरक्षणसज्ज राहणे हे तुलनेने कमी खर्चिक आहे. भारत आता याच युद्धनीतीचे अनुकरण करत आहे.

भारत अग्नि-५ या क्षेपणास्त्राच्या दोन नव्या आवृत्त्या विकसित करत आहे. त्यातील एक प्रकारच्या क्षेपणास्त्राने जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करता येईल. तर दुसऱ्या प्रकारच्या क्षेपणास्त्राने जमिनीखालील गोष्टींवर मारा करता येणार आहे.

अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी त्यांची विनाशकारी शक्ती व अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता यामुळे ती क्षेपणास्त्रे भारतासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहेत.