शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

बंकर बस्टर बॉम्ब नेण्याची भारताकडेही क्षमता?, अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:31 IST

डीआरडीओ ही संस्था तयार करत असलेल्या अग्नि-५च्या सुधारित आवृत्तीचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जमिनीखालील ८० ते १०० मीटरपर्यंत खोलवर असलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते.

नवी दिल्ली : अमेरिकेने  फोर्डो अणुकेंद्रावर जीबीयू-५७/ए या प्रचंड बंकर बस्टर बॉम्बने हल्ले केले. त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाचे खूप मोठे नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत हा अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती विकसित करत आहे. या क्षेपणास्त्रात सात हजार किलो वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असणार आहे.

डीआरडीओ ही संस्था तयार करत असलेल्या अग्नि-५च्या सुधारित आवृत्तीचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जमिनीखालील ८० ते १०० मीटरपर्यंत खोलवर असलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र बंकरखालील मजबूत संरचनांवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. इराणविरोधात अमेरिकेने वापरला तसा बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्यासाठी भारत क्षेपणास्त्र बनवित आहे.

शक्तिशाली प्रणाली

पाकिस्तान, चीनसारख्या देशांतील क्षेपणास्त्र तळ व संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी अग्नि-५च्या बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेणाऱ्या सुधारित आवृत्त्या खूप उपयोगी ठरतील असे संरक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या बंकर बस्टर प्रणालींहून शक्तिशाली असतील.

अमेरिकेच्या युद्धनीतीचे अनुकरण

बदललेल्या युद्धनीतीनुसार अमेरिका बंकर बस्टरसारख्या गोष्टींचा उपयोग करून अचूक लक्ष्यभेद करते. अशा प्रकारे संरक्षणसज्ज राहणे हे तुलनेने कमी खर्चिक आहे. भारत आता याच युद्धनीतीचे अनुकरण करत आहे.

भारत अग्नि-५ या क्षेपणास्त्राच्या दोन नव्या आवृत्त्या विकसित करत आहे. त्यातील एक प्रकारच्या क्षेपणास्त्राने जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करता येईल. तर दुसऱ्या प्रकारच्या क्षेपणास्त्राने जमिनीखालील गोष्टींवर मारा करता येणार आहे.

अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी त्यांची विनाशकारी शक्ती व अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता यामुळे ती क्षेपणास्त्रे भारतासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहेत.