शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चार महिन्यांचं मूल स्वत:हून आंदोलनाला जातं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 17:47 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआसरीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्दे दिल्लीतील शाहीनबाग येथे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन या आंदोलनात चा महिन्याच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूवरून सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी चार महिन्यांचे कुठले मूल स्वत:हून आंदोलनाला जाते ते आम्हाला सांगा

नवी दिल्ली -  नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआसरीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनात चा महिन्याच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूवरून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या मुलाच्या मृत्यूची स्वत:च दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच चार महिन्यांचे कुठले मूल स्वत:हून आंदोलनाला जाते ते आम्हाला सांगा असा सवालही विचारला आहे.

शाहीनबागमधील आंदोलनादरम्यान चार महिन्याच्या मुलाचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले. तर या प्रकरणी तीन आंदोलनकर्त्या महिलांनीही न्यायालयात आपला पक्ष मांडण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रेटा थनबर्ग ही आंदोलन बनली तेव्हाही मुलगीच होती, असा युक्तिवाद या महिलांनी आपल्या वकिलामार्फत केला. तसेच आपल्या मुलांना शाळेमध्ये पाकिस्तानी म्हटले जाते, असेही त्यांनी सांगितले.  

 हा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले की, आज कुठल्या मुलाला शाळेत पाकिस्तानी म्हटले हा विषय न्यायालयापुढे नाही. आज इथे एनपीपी, एनआरसी किंवा कुठल्या मुलाला पाकिस्तानी म्हटल्याची सुनावणी सुरू नाही आहे. न्यायालय ब्रदरहूडचा आदर करते. मात्र चार महिन्यांचे कुठले मूल स्वत:हून आंदोलनाला जाते ते आम्हाला सांगा, असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला. न्यायालय कुणाच्याही आवाजाची गळचेपी करत नाही आहे. मात्र इथे विनाकारण चर्चा होणार नाहीत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.  

शाहीन बागेतले आंदोलक कायमस्वरुपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

छातीवर गोळ्या झेलू पण कागदपत्रं दाखवणार नाही - असदुद्दीन ओवेसी

देशातील वास्तववादी मुद्दे ‘सीएए-एनआरसी’मुळे दुर्लक्षित, राष्ट्रीय चर्चासत्रात जेष्ठ विचारवंताचे मत

दरम्यान, आंदोलक कायमस्वरुपी अशाप्रकारे रस्ता अडवून ठेवू शकत नाही, असं मत न्यायालयानं व्यक्त केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होईल. इतके दिवस प्रतीक्षा केलीच आहे, तर आता आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी, असं न्यायमूर्तींनी सुनावणीची पुढील तारीख देताना म्हटलं. शाहीन बागेतल्या आंदोलनादरम्यान एका चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेचीदेखील न्यायालयानं दखल घेतली. याविषयीदेखील आज सुनावणी झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर शाहीन बागेसंबंधीच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायालयानं म्हटलं होतं. शाहीन बागेतल्या आंदोलकांना हटवण्यात यावं, अशी मागणी अनेक याचिकांमधून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNew Delhiनवी दिल्ली