शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औषधाच्या सिक्रेट फॉर्म्युल्यासाठी वैद्याचं अपहरण, नकार देताच केली हत्या, मृतदेह केला गायब, अखेर असं फुटलं बिंग   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:59 IST

Crime News: पारंपरिक उपचार पद्धतीमधील औषध देणाऱ्या वैद्याकडील सिक्रेट फॉर्म्युला मिळवण्यासाठी त्याचं अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची तसेच या गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुळव्याध बरा करण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धतीमधील औषध देणाऱ्या वैद्याकडील सिक्रेट फॉर्म्युला मिळवण्यासाठी त्याचं अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची तसेच या गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी एका चोरीच्या घटनेच्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

शबा शरीब असं अपहरण करून हत्या झालेल्या वैद्याचं नाव आहे. या प्रकरणी आता कोर्टाने तीन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. व्यावसायिक शैबिन अश्रफ, शिहाबुद्दीन आणि एन. निषाद अशी वैद्याची हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीचा मृतदेह मिळालेला नाही. मात्र त्याच्या शरीराचे अवयव ज्या वाहनातून नेण्यात आले. त्यामध्ये  मिळालेल्या काही केसांवरून तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या केसांची डीएनए चाचणी केल्यानंतर या प्रकरणात तो भक्कम पुरावा बनला. या प्रकरणात एकूण १५ जणांना आरोपी करण्यात आले  होते. त्यापैकी ३ जणांना दोषी ठरवण्यात आले. आता दोषींना शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.

याबाबत न्यायालयीन सुनावणीमधून समोर आलेल्या माहितीनुसार व्यावसायिक शैबिन आणि इतर आरोपींनी १ ऑगस्ट २०१९ रोजी वैद्य शबा शरीफ यांचं अपहरण केलं. तसेच त्यांना जवळपास १४ महिने घरात कोंडून ठेवलं. यादम्यान,   मुळव्याधावरील उपचारांसाठी ते वापरत असलेला फॉर्म्युल्या मिळवण्यासाठी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. या फॉर्म्युल्याचा व्यावसायिक वापर करून त्याद्वारे पैसे कमावण्याचा शैबिन याचा इरादा होता. त्याने शबा शरीफ यांना केरळमध्ये येण्यासाठी राजीही केलं. मात्र त्यांनी फॉर्म्युला देण्याचे नाकारताच त्यांना घरात कोंडून त्यांचा छळ केला.

दरम्यान, २०२२ साली एप्रिल महिन्यात शैबिन याने शिहाबुद्दीन, नौशाद आणि निशाद यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. तसेच ७ लाख रुपये रोख आणि लॅपटॉप चोरीला गेल्याचा आरोप केला. पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात करून आरोपींना अटक केल्यावर हत्येचं प्रकरणही उघडकीस आलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळCourtन्यायालय