शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus: तुमच्याकडे प्लॅनिंग आहे का? सुप्रीम कोर्टानेही केली केंद्राची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 06:07 IST

देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच २१०० हून अधिक बाधितांचे बळी गेले. कोरोनाशी संबंधित सर्वच बाबतीत देशात सध्या सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सातत्याने वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या, रुग्णालयांमध्ये कमी पडत असलेली खाटांची संख्या, प्राणवायूची भासत असललेली तीव्र टंचाई, औषधांचा तुटवडा, लसींचा अपुरा पुरवठा अशी देशभरात गोंधळाची स्थिती असताना या सगळ्यासाठी तुमच्याकडे काय आराखडा तयार आहे, अशी विचारणा करत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली. आज, शुक्रवारी या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. 

देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच २१०० हून अधिक बाधितांचे बळी गेले. कोरोनाशी संबंधित सर्वच बाबतीत देशात सध्या सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत  केंद्र सरकारकडे कोणता आराखडा तयार आहे, अशी विचारणा सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केली. आरोग्य यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या याचिका सध्या देशातील सहा उच्च न्यायालयांमध्ये दाखल आहेत. त्यांची एकत्रित दखल घेणे आम्ही इष्ट समजतो, असे स्पष्ट करत सरन्यायाधीशांनी प्राणवायूचा पुरवठा, गरजेच्या औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि प्रक्रिया यासंदर्भात केंद्राकडे काय आराखडा तयार आहे, याची विचारणा केली. 

आणीबाणीसदृश स्थिती प्राणवायूच्या पुरवठ्यासंदर्भातील अन्य एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी देशातील सद्य:स्थिती राष्ट्रीय आणीबाणीसदृश असल्याचे मत व्यक्त केले. 

दिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरेदिल्लीतील रुग्णालयांमध्ये प्राणवायूची तीव्र टंचाई भासत असून यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारी अनास्थेवर ताशेरे ओढले. तुम्ही भीक मागा, विकत आणा किंवा चोरी करा, परंतु रुग्णशय्येवर असलेल्या ्रप्रत्येक गरजूला पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा झालाच पाहिजे, असे स्पष्ट करत लोकांना तुम्ही असे प्राणवायूअभावी मरू देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय