शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राजकीय पक्षाला विचारुन आम्ही आदेश देतो का? कोर्टाने फटकारल्यानंतर CM रेवंत रेड्डींचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माफी मागितली आहे

Telangana CM Revanth Reddy :तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये रेवंत रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. आमचा आदर न केल्यास खटला अन्यत्रही चालवला जाऊ शकतो, असा इशारा सुप्रीम कोर्टाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिला होता. त्यानंतर रेड्डी यांनी माफीनामा सादर केला.

कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नुकताच बीआरएस नेत्या के. कविता यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. ईडी आणि सीबीआयच्या दोन्ही प्रकरणात प्रत्येकी १० लाखांच्या जामीनावर कविता यांना सोडण्यात आलं आहे. पाच महिन्यांनी के. कविता या तुरुंगाबाहेर आल्या आहेत. अशातच के. कविता यांच्या जामिनासाठी भाजप आणि बीआरएस यांच्यातील सौदेबाजी झाल्याचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाने सुप्रीम कोर्टाचेही लक्ष वेधले होते. त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना सुप्रीम कोर्टाने अशा विधानांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते असं म्हटलं होतं.

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या शब्दांबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मुख्यमंत्री रेड्डी यांनी आपले निवेदन दिलं आहे.  भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा दृढ विश्वास आहे आणि मला त्या विधानाबद्दल खेद वाटतो. २९ ऑगस्ट रोजी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या माझ्या वक्तव्यावरून मी माननीय न्यायालयावर प्रश्न उपस्थित करत असल्याचे दिसते. माझा न्याय आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. मी न्यायव्यवस्थेचा नेहमीच आदर करेन, असं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं.

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रेड्डी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना फटकारलं होतं. "त्यांनी काय म्हटले ते तुम्ही वर्तमानपत्रात वाचले आहे का? ते काय म्हणाले फक्त वाचा. एका जबाबदार मुख्यमंत्र्यांचे हे विधान कसले? यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी असे विधान करावे का? घटनात्मक पदावर असणारी व्यक्ती असे बोलत आहे का?", असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.

"कोर्टाला त्यांनी राजकारणात का ओढावे? राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून आम्ही आदेश देतो का? राजकीय नेते किंवा इतर कोणीही आमच्या निर्णयांवर टीका करण्यास आम्हाला हरकत नाही. आम्ही आमच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार आणि शपथेनुसार कर्तव्य बजावतो," असेही खंडपीठाने सुनावले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTelanganaतेलंगणा