शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राजकारण करा; पण कोर्टाविषयी सांभाळून बोला; राहुल गांधींना समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:50 IST

राफेलप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या न्यायालयीन अवमानना कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पडदा टाकला.

नवी दिल्ली : राजकारण जरूर करा; पण त्यात निष्कारण न्यायालयांना ओढू नका. सांभाळून बोला, अशा शब्दांत समज देऊन राफेलप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या न्यायालयीन अवमानना कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पडदा टाकला.गेल्या एप्रिलमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध टीकेची मोहीम सुरू केली होती. त्याच काळात राफेल विमाने खरेदी प्रकरणात मोदी सरकारला ‘क्लीन चिट’ देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या दिवशी राहुल गांधी यांना डेहराडूनमध्ये निकालाविषयी विचारले असता गांधी यांनी ‘अब सर्वोच्च न्यायालयने भी कहा है की चौकीदार चोर है’, असे वक्तव्य केले.न्यायालयाने न वापरलेले शब्द तोंडी घातल्याबद्दल गांधी यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई करावी, असा अर्ज भाजपच्या खा. मीनाक्षी लेखी यांनी केला. न्यायालयाने याबद्दल जाब विचारल्यावर राहुल गांधी यांनी सुरुवातीस कृतीचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र केले. मात्र, दुसऱ्या प्रतिज्ञापत्राद्वारे चूककबूल करून, बिनशर्त माफी मागितली. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने गांधी यांना वरील समज देऊन अवमानना कारवाई आटोपती घेतली.>काय म्हणाले न्यायालय?निकाल काय दिला, ते न पाहता न्यायालयानेही पंतप्रधानांविरुद्धच्या स्वत:च्या आरोपांवर शिक्कामोर्तब केल्याचे विधान राहुल यांनी करावे, हे दुर्दैवी आहे. निरनिराळ्या पद्धतीने त्यांनी पुन्हा तेच सांगितले.न्यायालयाच्या नोटिसीनंतर बिनशर्त दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी गांधी यांनी ‘चूक’ किंवा ‘माफी’ असे शब्द न वापरता २० पानांचे प्रतिज्ञापत्र करून वक्तव्याचे समर्थन केल्याने गैरकृतीचे गांभीर्य आणखीन वाढले; पण नंतर त्यांना शहाणपणाने त्यांनी बिनशर्त माफी लिहून दिली.राजकारणात महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने वक्तव्ये सांभाळूनच करायला हवीत. प्रचारात कोणती भूमिका घ्यायची हे नेत्याने ठरवायचे असले तरी ज्या गोष्टीचा उल्लेख नाही, अशा बाबी न्यायालयाच्या तोंडी टाकून न्यायालयांना राजकारणात ओढणे योग्य नाही.दिलगिरी स्वीकारून आम्ही या प्रकरणात गांधी यांना माफ करीत असलो तरी यापुढे त्यांनी काळजीपूर्वक वागायला हवे.>संसदीय समितीद्वारे चौकशी करा : राहुल गांधीराफेल विमान खरेदीप्रकरणात न्या. के. एम. जोसेफ यांनी स्वतंत्र निकालपत्र दिले असून, त्यातून या प्रकरणाच्या चौकशीला वाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संसदेच्या संयुक्त समितीतर्फे या खरेदीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी निकालानंतर केली. निकालानंतर जल्लोष करण्याऐवजी भाजपने नव्या चौकशीची तयारी ठेवावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस