शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

निवडणूक लाभांसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका, डॉ. स्वामीनाथन यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 10:58 IST

अर्थव्यवस्थेला मारक : डॉ. स्वामीनाथन यांचा राजकीय पक्षांना सल्ला

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये विजयी होण्याकरिता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये. असे निर्णय आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य नसतात असा सल्ला देशातील हरित क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांनी दिला आहे. ते म्हणाले की, कृषी क्षेत्रासमोरील अडचणी या आर्थिक स्वरुपाच्याच असतात. पाऊस व बाजारपेठेतील उलाढाली यावर लहान शेतकऱ्यांची व्यवहारक्षमता ठरत असते. अर्थव्यवस्थेला मारक अशी धोरणे राजकारण्यांनी राबवू नयेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांतील विधानसभा निवडणुकांत विजयी झाल्यानंतर काँग्रेसने तेथील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. विजयी झाल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी देऊ असे आश्वासन त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. या अनुषंगाने डॉ. स्वामीनाथन म्हणाले की, जेव्हा शेतकऱ्यांना खरोखरच कर्ज फेडणे शक्य नसेल तेव्हा त्यांना ही रक्कम माफ करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरतो. शेती ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व फायदेशीर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत. त्यामध्ये कर्जमाफीसारखे निर्णय घेणे अपेक्षित नसते.युवकांना शेतीकडे आकर्षित करावाढत्या कृषी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा, अशी मागणी दिल्लीत काही महिन्यांपूर्वी निदर्शने करणाऱ्यां शेतकऱ्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकांत पाचपैकी तीन राज्यांत शेतकºयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसला जे यश मिळाले, त्यामुळे सारेच पक्ष धास्तावले आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष आता शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा सवलती देण्याच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात डॉ. स्वामीनाथन म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व तरुणांनी कृषी व्यवसायाकडे आकर्षित व्हावे यासाठी धोरणे आखली पाहिजेत.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप