शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

निवडणूक लाभांसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका, डॉ. स्वामीनाथन यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 10:58 IST

अर्थव्यवस्थेला मारक : डॉ. स्वामीनाथन यांचा राजकीय पक्षांना सल्ला

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये विजयी होण्याकरिता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये. असे निर्णय आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य नसतात असा सल्ला देशातील हरित क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांनी दिला आहे. ते म्हणाले की, कृषी क्षेत्रासमोरील अडचणी या आर्थिक स्वरुपाच्याच असतात. पाऊस व बाजारपेठेतील उलाढाली यावर लहान शेतकऱ्यांची व्यवहारक्षमता ठरत असते. अर्थव्यवस्थेला मारक अशी धोरणे राजकारण्यांनी राबवू नयेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांतील विधानसभा निवडणुकांत विजयी झाल्यानंतर काँग्रेसने तेथील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. विजयी झाल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी देऊ असे आश्वासन त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. या अनुषंगाने डॉ. स्वामीनाथन म्हणाले की, जेव्हा शेतकऱ्यांना खरोखरच कर्ज फेडणे शक्य नसेल तेव्हा त्यांना ही रक्कम माफ करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरतो. शेती ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व फायदेशीर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत. त्यामध्ये कर्जमाफीसारखे निर्णय घेणे अपेक्षित नसते.युवकांना शेतीकडे आकर्षित करावाढत्या कृषी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा, अशी मागणी दिल्लीत काही महिन्यांपूर्वी निदर्शने करणाऱ्यां शेतकऱ्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकांत पाचपैकी तीन राज्यांत शेतकºयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसला जे यश मिळाले, त्यामुळे सारेच पक्ष धास्तावले आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष आता शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा सवलती देण्याच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात डॉ. स्वामीनाथन म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व तरुणांनी कृषी व्यवसायाकडे आकर्षित व्हावे यासाठी धोरणे आखली पाहिजेत.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप