शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पाकिस्तानवर थेट कारवाई नाही?

By admin | Updated: September 20, 2016 06:17 IST

मोदी सरकारने पाकला प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनैतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सत्ताधारी भाजपामधील ‘साहसी’ मंडळींचा ताबडतोब ‘कारवाई’साठी दबाब वाढत असला तरी मोदी सरकारने पाकला प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनैतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. उरी येथील हल्ल्यामुळे देशभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यात १८ जवान ठार तर २३ जखमी झाले. उरी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अनेक बैठकांत आढावा घेतल्यानंतर मोदी सरकारमधील मंत्र्यांमागून मंत्र्यांनी पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी त्यांचे प्रायोजकत्व करतो, चिथावणी, मदत देतो व कटकारस्थाने करतो, असे थेट हल्ले केले. सुरवातीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोदी यांना माहिती दिली. नंतर गृहमंत्री राजनाथ सिंह, त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीत सहभागी झाले. तासाभरानंतर अर्थमंत्री अरूण जेटली सहभागी झाले व नंतर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीला माहिती दिली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज मोदी यांच्याशी फोनवर बोलल्या.व्यापक पहारा असतानाही भारतीय हद्दीत दहशतवादी घुसलेच कसे आणि दोन वर्षांपूर्वी ज्या छावणीवर हल्ला झाला होता तिच्यावरच पुन्हा कसा हल्ला झाला, या शब्दांत पंतप्रधानांनी मनोहर पर्रीकर यांच्याकडे संताप व्यक्त केला. दुसरे म्हणजे दहा दिवसांपूर्वी उरी छावणीवर हल्ला होईल असा इशारा गुप्तचरांनी दिला होता. सीमेवर आणि आतमध्ये सुरक्षा दलांकडून जो हलगर्जीपणा दाखवला गेला त्याबद्दलही मोदी संतप्त झाले. तथापि, भावनेच्या भरात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सुषमा स्वराज सध्या अमेरिकेत असून त्या संयुक्त राष्ट्रांच्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत उरी हल्ल्याचा विषय उपस्थित करतील. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे संयुक्त राष्ट्रांत २१ जून रोजी बोलणार आहेत. >‘मानवतेचा शत्रू’ म्हणून जाहीर करावेगृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला ‘दहशतवादी देश’ म्हटले होते तर वरिष्ठ मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला ‘मानवतेचा शत्रू’ म्हणून जाहीर करावे, असे वाटते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सकाळी ‘पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले. हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याचे आम्हाला माहीत असून, त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. दहशतवादाला खतपाणी देत असल्याबद्दल जगात पाकिस्तानचे नाव घेऊन व त्याचा निषेध करायचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पाकच्या दहशतवादी कारवायांना उघडे पाडण्यासाठी मंत्र्यांच्या तुकड्या वेगवेगळ्या देशांत पाठविल्या जाऊ शकतील. दहशतवादी हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याबद्दल कारवाई करता येईल असा पुरावा लष्करी कारवायांचे महासंचालक रणबीर सिंह यांच्याकडून त्याच्यासमोर ठेवला जाईल. सरकारच्या सावध भूमिकेची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भावनेच्या पातळीवर आम्ही कारवाई करू शकत नाही.’’ सरकारकडून घाईघाईत कोणतीही हालचाल होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.