शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:28 IST

काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. पण निर्णय सामूहिक विचारांतूनच होतो. त्यामुळे बैठकीत जे बोलले जाते, त्याची माहिती कोणीही बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना काँग्रेसने सर्व नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत कमलनाथ, अशोक गेहलोत व पी. चिदम्बरम आपल्या मुलांना उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते, असे तक्रारवजा उद्गार राहुल गांधी यांनी काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांना या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवा, अंदाज व अर्धवट माहिती याआधारे बातम्या देण्याचे माध्यमांनीही टाळावे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांचे जे महत्त्व असते, ते सर्वांनी पाळायला हवे, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे.प्रवक्त्याचे हे म्हणणे ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे मानले जात आहे. पराभवानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यासंबंधी काही माध्यमांत आलेल्या बातम्या अनावश्यक तसेच अफवा वा अंदाजांच्या आधारे होत्या, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसला संघटनेत मोठे फेरबदल करण्याची व चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत, असेही सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.>प्रदेशाध्यक्षांचे राजीनामेनिवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊ न पंजाब, आसाम व झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोमवारी आपले राजीनामे पक्षाध्यक्षांना सादर केले. आतापर्यंत १३ प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस