शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:28 IST

काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. पण निर्णय सामूहिक विचारांतूनच होतो. त्यामुळे बैठकीत जे बोलले जाते, त्याची माहिती कोणीही बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना काँग्रेसने सर्व नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत कमलनाथ, अशोक गेहलोत व पी. चिदम्बरम आपल्या मुलांना उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते, असे तक्रारवजा उद्गार राहुल गांधी यांनी काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांना या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवा, अंदाज व अर्धवट माहिती याआधारे बातम्या देण्याचे माध्यमांनीही टाळावे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांचे जे महत्त्व असते, ते सर्वांनी पाळायला हवे, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे.प्रवक्त्याचे हे म्हणणे ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे मानले जात आहे. पराभवानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यासंबंधी काही माध्यमांत आलेल्या बातम्या अनावश्यक तसेच अफवा वा अंदाजांच्या आधारे होत्या, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसला संघटनेत मोठे फेरबदल करण्याची व चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत, असेही सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.>प्रदेशाध्यक्षांचे राजीनामेनिवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊ न पंजाब, आसाम व झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोमवारी आपले राजीनामे पक्षाध्यक्षांना सादर केले. आतापर्यंत १३ प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस