शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:28 IST

काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. पण निर्णय सामूहिक विचारांतूनच होतो. त्यामुळे बैठकीत जे बोलले जाते, त्याची माहिती कोणीही बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना काँग्रेसने सर्व नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत कमलनाथ, अशोक गेहलोत व पी. चिदम्बरम आपल्या मुलांना उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते, असे तक्रारवजा उद्गार राहुल गांधी यांनी काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांना या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवा, अंदाज व अर्धवट माहिती याआधारे बातम्या देण्याचे माध्यमांनीही टाळावे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांचे जे महत्त्व असते, ते सर्वांनी पाळायला हवे, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे.प्रवक्त्याचे हे म्हणणे ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे मानले जात आहे. पराभवानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यासंबंधी काही माध्यमांत आलेल्या बातम्या अनावश्यक तसेच अफवा वा अंदाजांच्या आधारे होत्या, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसला संघटनेत मोठे फेरबदल करण्याची व चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत, असेही सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.>प्रदेशाध्यक्षांचे राजीनामेनिवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊ न पंजाब, आसाम व झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोमवारी आपले राजीनामे पक्षाध्यक्षांना सादर केले. आतापर्यंत १३ प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस