शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतराला राजकीय रंग देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 06:06 IST

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली.

नवी दिल्ली : धर्मांतर ही गंभीर समस्या आहे, याला राजकीय रंग देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावले. या प्रकरणाची ७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली. यावर न्यायालय सुनावणी करत होते. याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असून, राज्यात अशा धर्मांतराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तामिळनाडूतर्फे ज्येष्ठ वकील पी. विल्सन यांनी ठामपणे म्हणाले.‘न्यायालयीन कामकाज भरकटवू नका. तुमच्या राज्यात असे घडत असेल तर ते वाईट आहे. एका राज्याला लक्ष्य करण्यात येत आहे, अशा दृष्टीने पाहू नका. राजकीय बनवू नका,’ असे न्यायालयाने सुनावले.

याचिकेत काय म्हटले?

सक्तीचे धर्मांतर ही एक देशव्यापी समस्या आहे, ज्यावर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांना होणारी जखम खूप मोठी आहे कारण असा एकही जिल्हा नाही जो धर्मांतरमुक्त आहे. देशभर दर आठवड्याला फसवे धर्मांतर केले जाते; परंतु केंद्र आणि राज्यांनी हा धोका रोखण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत. फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक तयार करण्याचे निर्देश द्यावेत.

महाधिवक्त्यांची मदत हवी...

धमकावणे, भेटवस्तू आणि आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांवर आळा घालावा, यासंदर्भातील याचिकेत ‘न्यायालयाचे मित्र’ (ॲमॅकस क्युरी) म्हणून हजर व्हावे, अशी सूचना न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने वेंकटरमानी यांना केली. बळजबरीने, प्रलोभन इ. मार्गांनी धर्मांतर होत आहे का, त्यावर उपाय काय आहेत? याबद्दल वेंकटरमानी यांनी माहिती द्यावी, असे खंडपीठाने सांगितले.

मुद्दा एका राज्याचा नाही

धर्मांतर हा मुद्दा काही एका राज्याचा नाही, तर आम्हाला संपूर्ण देशाची चिंता आहे. एका राज्यापुरता हा प्रश्न ठेवता येणार नाही. याला राजकीय रंग देऊ नये. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतPoliticsराजकारण