शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

धर्मांतराला राजकीय रंग देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 06:06 IST

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली.

नवी दिल्ली : धर्मांतर ही गंभीर समस्या आहे, याला राजकीय रंग देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावले. या प्रकरणाची ७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली. यावर न्यायालय सुनावणी करत होते. याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असून, राज्यात अशा धर्मांतराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तामिळनाडूतर्फे ज्येष्ठ वकील पी. विल्सन यांनी ठामपणे म्हणाले.‘न्यायालयीन कामकाज भरकटवू नका. तुमच्या राज्यात असे घडत असेल तर ते वाईट आहे. एका राज्याला लक्ष्य करण्यात येत आहे, अशा दृष्टीने पाहू नका. राजकीय बनवू नका,’ असे न्यायालयाने सुनावले.

याचिकेत काय म्हटले?

सक्तीचे धर्मांतर ही एक देशव्यापी समस्या आहे, ज्यावर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांना होणारी जखम खूप मोठी आहे कारण असा एकही जिल्हा नाही जो धर्मांतरमुक्त आहे. देशभर दर आठवड्याला फसवे धर्मांतर केले जाते; परंतु केंद्र आणि राज्यांनी हा धोका रोखण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत. फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक तयार करण्याचे निर्देश द्यावेत.

महाधिवक्त्यांची मदत हवी...

धमकावणे, भेटवस्तू आणि आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांवर आळा घालावा, यासंदर्भातील याचिकेत ‘न्यायालयाचे मित्र’ (ॲमॅकस क्युरी) म्हणून हजर व्हावे, अशी सूचना न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने वेंकटरमानी यांना केली. बळजबरीने, प्रलोभन इ. मार्गांनी धर्मांतर होत आहे का, त्यावर उपाय काय आहेत? याबद्दल वेंकटरमानी यांनी माहिती द्यावी, असे खंडपीठाने सांगितले.

मुद्दा एका राज्याचा नाही

धर्मांतर हा मुद्दा काही एका राज्याचा नाही, तर आम्हाला संपूर्ण देशाची चिंता आहे. एका राज्यापुरता हा प्रश्न ठेवता येणार नाही. याला राजकीय रंग देऊ नये. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतPoliticsराजकारण