शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात येऊ नका! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:48 IST

सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

बेळगाव - महाराष्ट्रकर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने येत आहेत. सीमाप्रश्नी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे बेळगाव दौरा करणार होते. परंतु या दौऱ्यावर लक्ष करत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकाची महाराष्ट्रावर कुरघोडी सुरूच आहे. 

बेळगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बोलत होते. ते म्हणाले की, सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये. याबाबत कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना ही माहिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सीमेपलीकडील जनता आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांना निधी दिला जात नाही. मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. कन्नड रक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून या शाळांना निधी दिला जाईल. सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचं म्हटलं आहे. 

शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणामहाराष्ट्राचं सरकार अशाप्रकारे फतवा काढणार का की कर्नाटकच्या मंत्र्यांनी इथे येऊ नये. कर्नाटकचे मंत्री महाराष्ट्रात येतात आम्ही कधी त्यांना अडवत नाही. महाराष्ट्रात मुंबईत अनेक कानडी बंधू राहतात. बेळगाव, कारवारसह सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय होतात. तिथे आपले सरकार २ मंत्री पाठवतायेत. पण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनाही पाय ठेऊ देणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितले. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या सरकारवर थुंकताय हे परत सिद्ध झाले. तुम्ही जी क्रांती केलीय त्याचं काय? मंत्र्यांना पाय ठेवू दिला जात नाही असं देशात होत नाही. मतभेद असू शकतात. यायचं नाही ही मुजोरी मस्ती याआधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झालं नाही. राज्यात जे स्वयंभू क्रांतीचं सरकार आलंय त्यांना महाराष्ट्र अद्याप कळालेला नाही. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांचे आहेत असं वाटतं. हा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं. हे घटनेला, संविधानाला दिलेले आव्हान आहे. या देशातील नागरीक कुठेही जाऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे. निदान उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलावं. सरकारला जमत नसेल तर आम्ही बेळगावला जाण्याचा विचार करू असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rautसंजय राऊत