शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:30 IST

प्रियंका गांधींचा भर सभेत मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी वजा इशारा.

Priyanka Gandhi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काल(दि.7) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. रीगा येथे झालेल्या सभेत भाषण करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे. 

निवृत्ती सुखाची होईल असे समजू नका...

प्रियंका गांधी म्हणाल्या, "ज्ञानेश कुमार, जर तुम्हाला वाटतं असेल की, निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येईल, तर तसे होणार नाही. मी जनतेला सांगते, या नावाला कधीही विसरू नका." यावेळी प्रियंकांनी ज्ञानेश कुमार यांच्यासोबत इतर निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांचीही नावे घेतली. भाषणादरम्यान जेव्हा त्यांनी या तिघांची नावे घेतली, तेव्हा उपस्थितांनी “चोर-चोर” अशी घोषणाबाजी केली.

प्रियंका गांधी यांनी सभेत हरियाणा निवडणुकीचा उल्लेख करत म्हटले की, "हरियाणामध्ये मतांची चोरी कशी झाली, ते तुम्ही पाहिले. मी तुम्हाला सांगते, ही तीन नावे लक्षात ठेवा- ज्ञानेश कुमार, एस. एस. संधू आणि विवेक जोशी. या लोकांनी लोकशाहीशी विश्वासघात केला आहे. जनता आमची आई आहे. आई उदार असते, पण जर तिच्याशी फसवणूक झाली, तर ती माफ करत नाही. हे लोक निवृत्ती घेऊन शांततेत राहतील असे वाटत असेल, तर त्यांनी तो विचार आता सोडून द्यावा," असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला.

राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्ला

यापूर्वी राहुल गांधींनीही अनेकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला की, हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सुमारे 25 लाख बनावट मतांच्या माध्यमातून ‘चोरी’ झाली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस समर्थक मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi Warns Election Commissioner: Retirement Won't Be Peaceful

Web Summary : Priyanka Gandhi threatened Election Commissioner Gyanesh Kumar, suggesting a difficult post-retirement life. She accused him and other officials of betraying democracy during Bihar elections, referencing alleged voter fraud. Rahul Gandhi has also criticized the Election Commission.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग