शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:30 IST

प्रियंका गांधींचा भर सभेत मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी वजा इशारा.

Priyanka Gandhi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काल(दि.7) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. रीगा येथे झालेल्या सभेत भाषण करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे. 

निवृत्ती सुखाची होईल असे समजू नका...

प्रियंका गांधी म्हणाल्या, "ज्ञानेश कुमार, जर तुम्हाला वाटतं असेल की, निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येईल, तर तसे होणार नाही. मी जनतेला सांगते, या नावाला कधीही विसरू नका." यावेळी प्रियंकांनी ज्ञानेश कुमार यांच्यासोबत इतर निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांचीही नावे घेतली. भाषणादरम्यान जेव्हा त्यांनी या तिघांची नावे घेतली, तेव्हा उपस्थितांनी “चोर-चोर” अशी घोषणाबाजी केली.

प्रियंका गांधी यांनी सभेत हरियाणा निवडणुकीचा उल्लेख करत म्हटले की, "हरियाणामध्ये मतांची चोरी कशी झाली, ते तुम्ही पाहिले. मी तुम्हाला सांगते, ही तीन नावे लक्षात ठेवा- ज्ञानेश कुमार, एस. एस. संधू आणि विवेक जोशी. या लोकांनी लोकशाहीशी विश्वासघात केला आहे. जनता आमची आई आहे. आई उदार असते, पण जर तिच्याशी फसवणूक झाली, तर ती माफ करत नाही. हे लोक निवृत्ती घेऊन शांततेत राहतील असे वाटत असेल, तर त्यांनी तो विचार आता सोडून द्यावा," असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला.

राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्ला

यापूर्वी राहुल गांधींनीही अनेकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला की, हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सुमारे 25 लाख बनावट मतांच्या माध्यमातून ‘चोरी’ झाली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस समर्थक मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल यांचा आरोप फेटाळून लावला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Gandhi Warns Election Commissioner: Retirement Won't Be Peaceful

Web Summary : Priyanka Gandhi threatened Election Commissioner Gyanesh Kumar, suggesting a difficult post-retirement life. She accused him and other officials of betraying democracy during Bihar elections, referencing alleged voter fraud. Rahul Gandhi has also criticized the Election Commission.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग