शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

डी के सुरेश यांची वेगळा देश बनविण्याच्या मागणी; डी के शिवकुमार यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 19:24 IST

आज केंद्र सरकाने अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया येत आहेत.

Congress ( Marathi News ) : आज केंद्र सरकाने अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया येत आहेत. कर्नाटककाँग्रेसचे नेते डी के सुरेश यांचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असं वक्तव्य डी के सुरेश यांनी केले. यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

मालदीवने रंग बदलले, तरीही भारताने बजेटमध्ये दुप्पट पैसे दिले; का आणि कशासाठी? 

"डीके सुरेश किंवा इतर कोणत्याही नेत्याने दक्षिण भारताच्या वेदना बोलल्या आहेत. अर्थसंकल्पात समतोल असायला हवा. संपूर्ण देश एक आहे. हिंदी पट्ट्याकडे बघा. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेचे समान वाटप नाही. कर्नाटक केंद्राला भरपूर महसूल देत आहे. संपूर्ण दक्षिण भारतासाठी कोणतीही मोठी घोषणा या अर्थसंकल्पात केलेली नाही, असा आरोप डी के शिवकुमार यांनी केला. केंद्राने आम्हाला निराश केले आहे. पण संपूर्ण देश एक आहे. आम्ही भारतीय आहोत. भारताने एकसंध असले पाहिजे, असंही डी के शिवकुमार म्हणाले.

डी के सुरेश यांचं वक्तव्य काय?

कर्नाटकचेकाँग्रेस खासदार डी के सुरेश यांनी अर्थसंकल्पानंतर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्र डी के शिवकुमार यांचे भाऊ असलेल्या सुरेश यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असे वक्तव्य सुरेश यांनी केले आहे. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून भाजपाने सुरेश यांच्यावर टीका केली आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना डीके सुरेश यांनी वरील वक्तव्य केले आहे. केंद्राने आम्हाला जे पैसे देणे बाकी आहेत ते जरी आम्हाला दिले तर ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचे घडतेय हे आम्ही पाहत आहोत, असा आरोप सुरेश यांनी केला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस