शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:08 IST

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं.

ठळक मुद्दे पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं.खगडिया जिल्ह्यातील सर्वात कमी विकसित असलेल्या अलौली विभागातील 3 गावांमधून माहिती घेण्यास सुरुवात केली.

पाटणा - देशात गेल्या 3 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधित विपरित परिणाम सर्वसामान्य नागरिक आण मजूर, कामगार वर्गावर झाला. आपल्या रोजगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळ्यानंतर मोठ्या शहरांतून, महानगरांतून मजूर आणि कामगार वर्ग आपल्या गावी स्थलांतरीत झाला. आपल्या राज्यात परतलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बिहारमधील नितीश कुमार सरकारने पुढाकार घेतला. त्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 जून रोजी श्रमिक कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटनही केलं.  

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं. कामगारांना 125 दिवसांचे काम देण्याचं या योजनेत नमूद करण्यात आलंय. मात्र, ज्या जिल्ह्यात या योजनेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. त्याच जिल्ह्यातील कामगारांना अद्यापही रोजगार मिळाला नाही. 

द इंडियन एक्सप्रेसने पंतप्रधान रोजगार अभियानांतर्गत मिळणाऱ्या रोजगारासंदर्भात खगडिया जिल्ह्यातील सर्वात कमी विकसित असलेल्या अलौली विभागातील 3 गावांमधून माहिती घेण्यास सुरुवात केली. हरिपूर, मेघौना आणि सहसी या गावात रोजगार अभियनांतर्गत उपलब्ध झालेल्या रोजगारासंबंधीची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार, हरिपूरमध्ये पावसामुळे काम बंद झाल्याचे दिसून आले, त्यामुळे 100 मजुरांवर बिकट परिस्थिती आली असून 20 मजूर हे स्थलांतरीत आहेत. तर, येथील मनरेगा अधिकारी रामकेबल पंडित पीएम गरिब कल्याण अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या रोजागाराची माहिती देण्यात असमर्थ ठरले. 

दुसरीकडे गिद्ध गावातील परिस्थितीही वेगळी नाही, येथे वाड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, या कामातून केवळ 6 जणांना 20 दिवसांचे काम मिळाल्याचं मनरेगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तर, मैघौना पंचायत विभागात अद्यापही पीएम रोजगार अभियानांतर्गत रोजगार उपलब्ध झाला नाही. अलौली येथे 21 ग्रामपंचायत क्षेत्र असून त्यापैकी 10 गावातही अद्याप या योजनेतून कामे देण्यात आली नाहीत. अलौली चे विस्तार अधिकारी म्हणाले की, या विभागात केवळ 3 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये, 21 सार्वजनिक शौचालय बनविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत 30 दिवसांचे काम निर्माण होईल. त्यासाठी 300 रुपये रोजगार देण्यात येणार आहे.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारMigrationस्थलांतरणLabourकामगार