कुमुदा-आर्यन शुगर्सवर आरआरसीप्रमाणे कारवाई करा जिल्हाधिकारी : तत्काळ कार्यवाही करण्याचे तहसीलदारांना आदेश
By Admin | Updated: July 7, 2015 22:56 IST2015-07-07T22:56:07+5:302015-07-07T22:56:07+5:30
बार्शी :

कुमुदा-आर्यन शुगर्सवर आरआरसीप्रमाणे कारवाई करा जिल्हाधिकारी : तत्काळ कार्यवाही करण्याचे तहसीलदारांना आदेश
ब र्शी : तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर्स साखर कारखान्याकडे शेतकर्यांच्या ऊस बिलाची असलेली थकबाकी जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे (आरआरसी) वसूल करून वसुलीची रक्कम तहसीलदार यांच्या लेख्यात जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना दिले आहेत. या वसुलीची कार्यवाही तत्काळ करावी, असे जिल्हाधिकारी यांनी या पत्रात म्हटले आहे. सन २०१४-१५ मध्ये आर्यन शुगर्सकडे ऊस गाळपासाठी दिलेल्या बहुतांश शेतकर्यांना ऊसबिलापोटीच्या पहिल्या हप्त्याची रक्कमदेखील अद्याप मिळालेली नाही़ यासाठी कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक डॉ.अविनाश भोसले, व्हा़ चेअरमन बापू नलावडे तसेच इतर संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाशी संबंधित ऊस उत्पादक शेतकर्यांनी वारंवार बिलासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ऊस गाळप होऊन हंगाम बंद झाला व पंधरा दिवसात पेेमेंट देणे कायद्याने बंधनकारक असताना चार महिने झाले तरीही शेतकर्यांना उसाचे बिल न मिळाल्याने अखेर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पीडित ऊस उत्पादक शेतकर्यांनी दि. १४ मेपासून बार्शी तहसीलसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे ़ आंदोलनाच्या रेट्याने अखेर प्रशासनाला जाग येऊन दि. २६ मे रोजी साखर आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी आरआरसीनुसार कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्तेची विहीत पध्दतीद्वारे विक्री करून गाळप हंगाम २०१४-१५ मधील एफआरपीप्रमाणे ऊस देयबाकी रक्कम आदेशाप्रमाणे वसूल करण्याबाबत कळविलेले आहे. त्यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर आता जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्तांच्या पत्राचा संदर्भ देत आरआरसीप्रमाणे वसुलीचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत.