भीमाकाठचा वीजपुरवठा नियमित करा शेतकरी संघटनेची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30
दक्षिण सोलापूर : सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली औज (मं) आणि चिंचपूर बंधार्याच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े ही वीज नियमितपणे पुरवण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आह़े

भीमाकाठचा वीजपुरवठा नियमित करा शेतकरी संघटनेची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
द ्षिण सोलापूर : सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली औज (मं) आणि चिंचपूर बंधार्याच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े ही वीज नियमितपणे पुरवण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आह़े उजनी जलाशयातून सोलापूर शहरासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले आह़े पाणी अजून औज बंधार्यात पोहोचायला 10 दिवस लागणार आहेत़ वीज वितरण कंपनीने त्याआधीच औज(मं) आणि चिंचपूर बंधार्यावरील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला आह़े गेली तीन दिवस या भागातील महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या विद्युत मोटारी बंद आहेत़ जनावरांच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनला आह़े कर्नाटक हद्दीत मात्र 24 तास वीजपुरवठा असल्याने तेथील शेतकरी बेसुमार पाण्याचा उपसा करीत आहेत़ याकडे महामूद पटेल यांनी जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधल़े (प्रतिनिधी)