शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मला जन्मभरासाठी अपात्र करा, लोकशाहीसाठी लढतच राहीन; राहुल गांधी यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 06:28 IST

अदानींवरून लक्ष विचलित करण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली : मला संसदेतून आजीवन अपात्र ठरविले किंवा तुरुंगवास झाला तरीही देशातील लोकशाहीचे रक्षण करत राहू, अशा शब्दात आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. घाबरलेल्या सरकारने त्यांना अपात्र ठरवून विरोधकांकडे मोठे शस्त्र दिल्याचा दावा त्यांनी केला.  

लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील त्यांच्या पुढच्या भाषणाला घाबरले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हा संपूर्ण खेळ या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा होता. कारण, सरकारला या प्रकरणावरून भीती वाटत होती. 

अदानी प्रकरणावर प्रश्न विचारत राहणार असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, अदानी शेल फर्ममध्ये  २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आणि त्या व्यावसायिकाचे पंतप्रधानांशी काय संबंध आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या देशात लोकशाही संपली आहे, असे सांगून ते म्हणाले की, ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यात कधीही परकीय हस्तक्षेपाची मागणी आपण केली नाही. आपल्याविरुद्ध संसदेत खोटे बोलले गेल्याचा आरोप त्यांनी केंद्रीय मंत्र्यावर केला. यावर आपल्याला उत्तर द्यायचे आहे, परंतु परवानगी नाही, असेही ते म्हणाले. 

माफी? माझे नाव गांधी, सावरकर नाही...

माझे नाव सावरकर नाही. माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाला माफी मागत नाहीत, असे राहुल एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप करून भाजप लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असून, उद्योगपती अदानी यांच्याशी पंतप्रधान मोदींचे काय नाते आहे, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, मी इथे भारतीय लोकांच्या आवाजाचे रक्षण करत आहे.

मी धमक्यांना, अपात्रतेला, आरोपांना, तुरुंगवासाच्या शिक्षांना घाबरत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. ते म्हणाले की, त्यांना सर्वांचे लक्ष विचलित करायचे आहे. तुम्ही चोर पकडलात, तर पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतील, मी ते केले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ते म्हणतील तिकडे बघा, तिकडे बघा... भाजप हेच करत आहे. 

हे सर्व नाटक - ओबीसी, अपात्रता, देशद्रोही या भीतीपासून लक्ष विचलित करण्यासाठी रचले जात आहे. अदानीसोबतचे आपले संबंध उघड होत असल्याची पंतप्रधानांना भावना आहे. ते नाते उघड होणार आहे. ते कोणी थांबविणार नाही. हे होणार आहे कारण विरोधक ते उत्तर शोधणार आहेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस