शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'जेएनयू'मधील रस्त्याला सावरकरांचे नाव दिल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:29 IST

विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा आईशी घोषने सावरकर यांचे नाव रस्त्याला देण्यावर आक्षेप घेतला आहे. ही बाब जेएनयूच्या वारसांसाठी लाजीरवानी आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांना जेएनयूच्या जवळपास कधीही स्थान नव्हते आणि राहणारही नाही, असंही आइशीने ट्विट करून म्हटले आहे.  

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वि.दा. सावरकर यांचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे. जेएनयू स्टुडंट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला विद्यापीठ प्रशासनाने सावरकर यांचे नाव दिले आहे. मात्र या रस्त्याचे नाव पुन्हा बदलण्यात आले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वि.दा. सावरकर मार्ग असा फलक लावण्यात आला होता. विद्यापीठ कार्यकारी परिषदेनेच या रस्त्याला सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी सांगितले. याआधी या रस्त्याला कोणतेही नाव देण्यात आलेले नव्हते. मात्र या कृतीचा एनएसयूकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच मार्गाचे नावही बदलण्यात आल्याचे समजते. 

एनएसयूने या मार्गाचे नावे बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग केल्याचा दावा एनएसयूचे सचिव सायमन फारुकी यांनी केला. या संदर्भातील दोन फोटो त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये वि.दा. सावरकर मार्गाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग केल्याचे दिसून येते.

या व्यतिरिक्त विद्यार्थी परिषदेची अध्यक्षा आईशी घोषने सावरकर यांचे नाव रस्त्याला देण्यावर आक्षेप घेतला आहे. ही बाब जेएनयूच्या वारसांसाठी लाजीरवानी आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांना जेएनयूच्या जवळपास कधीही स्थान नव्हते आणि राहणारही नाही, असंही आइशीने ट्विट करून म्हटले आहे.