शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

शेती, बेरोजगारी, दुष्काळावर विरोधकांना संसदेत हवी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 06:36 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

नवी दिल्ली : शेतकऱ्यांची बिकट अवस्था, बेरोजगारी, दुष्काळ, जम्मू-काश्मीरमधील निवडणुका यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे केली आहे.संसदेचे अधिवेशन उद्या, १७ जूनपासून सुरू होत आहे. ते २६ जुलैपर्यंत चालणार आहे. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सर्व पक्षांची एक बैठक रविवारी आयोजित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर  गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, लोकहिताची विधेयके मंजूर करण्यात विरोधी पक्ष अडथळे आणणार नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेण्यात याव्यात. जर तिथे लोकसभा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात तर विधानसभा निवडणुका का नाही असा सवालही त्यांनी केला. काश्मीरमध्ये राज्यपालांमार्फतच कारभार हाकण्याचा केंद्राचा विचार दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना एक तृतीयांश राखीव जागा ठेवण्यासाठीचे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडावे अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी या बैठकीत केली.एकत्र निवडणुका घेण्याबाबत बुधवारी चर्चादेशभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांच्या अध्यक्षांची एक बैठक येत्या बुधवारी बोलावली आहे. २०२२ हे भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृतमहोत्सवी वर्ष असून यंदा महात्मा गांधी यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित करण्याच्या कार्यक्रमांबद्दलही या बैठकीत चर्चा होईल.

टॅग्स :Parliamentसंसद