शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

महागाई, अग्निपथ योजना, तपास यंत्रणांच्या गैरवापरावर चर्चा घ्या! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 08:05 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :संसदेत महागाई, अग्निपथ योजना त्याचबरोबर तपास यंत्रणांचा कथित गैरवापर मुद्यांवर चर्चा घ्यावी, अशी मागणी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत केली. त्यांनी असंसदीय शब्दांच्या यादीवरही आक्षेप घेतला.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. लष्करी दलातील भरतीसाठीची अग्निपथ योजना तत्काळ मागे घेण्याची एकमुखी मागणी नेत्यांनी बैठकीत केली. अधिवेशनात भाववाढ आणि अर्थव्यवस्थेची स्थिती यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा घेण्याची मागणी केली.

बैठकीला कोण होते उपस्थित? 

राजनाथसिंह यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांच्यासह प्रल्हाद जोशी व पीयूष गोयल यांनी बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, द्रमुकचे टीआर बालू, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय, शरद पवार, बीजदचे मिश्रा, वायएसआरचे विजयसाई रेड्डी, टीआरएसचे केशव राव, राजदचे ए.डी. सिंग आणि सेनेचे संजय राऊत आदी नेते बैठकीला उपस्थित होते.

‘चुकीच्या अटकेबद्दल सरकारी नोकरी द्या’

चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आलेल्या लोकांना सुटकेनंतर योग्य भरपाई आणि सरकारी नोकरी दिली जावी तसेच जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी असलेले खासगी विधेयक आपण संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडणार आहोत, असे काँग्रेस खासदार मोहंमद जावेद यांनी रविवारी सांगितले. खा. जावेद बिहारमधील किशनगंज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

सरकारकडून विधेयकांचा महापूर सरकार ३२ विधेयके आणणार आहे. १४ दिवसांत ही विधेयके संसदेत कशी काय मंजूर होऊ शकतील, अशी विचारणा करत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकार काय करण्याचा प्रयत्न करतेय, असा सवाल केला. भाववाढ, अग्निपथ, देशाच्या संघराज्यीय रचनेवर हल्ला आणि ईडी आणि सीबीआयसारख्या तपास संस्थांचा दुरुपयोग यासह १३ मुद्दे आम्ही उपस्थित केले, असे खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले.

सरकार काय म्हणते?

विरोधी पक्ष जे मुद्देच नाहीत त्यांना मुद्दे बनवून संसदेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. संसदेचे नियम आणि प्रक्रियांच्या अंतर्गत सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. अधिवेशनापूर्वी असंसदीय शब्दांची यादी आणि विविध परिपत्रके जारी करणे ही नियमित प्रक्रिया आहे.

‘असंसदीय शब्दांची यादी योग्यच’

अग्निपथ, भाववाढ आणि असंसदीय शब्दांची यादी हे मुद्दे प्रत्येक पक्षाने उपस्थित केले, असे इंडियन युनियन मुस्लीम लीगचे ई.टी. मोहंमद बशीर यांनी सांगितले. बिजदचे नेते पिनाकी मिश्रा यांनी असंसदीय शब्दांची यादी जारी केल्याबाबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे समर्थन केले. त्याचबरोबर महिला आरक्षण विधेयकाचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली.

एकीकडे सरकार राष्ट्रपतिपदाच्या आपल्या उमेदवाराला मत देण्याची मागणी करत आहे आणि दुसरीकडे ते वन अधिकार कायदा २००६ मोडीत काढू पाहत असल्याचे सांगत रालोआला पाठिंबा देणाऱ्याच अनेक पक्षांनी मोदी सरकारमधील विरोधाभास बैठकीत मांडला. -जयराम रमेश, काँग्रेस नेते

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार