शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जम्मू-काश्मिरात नव्या राज्यपालांचा शोध, दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची चर्चा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:03 AM

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारची युती संपुष्टात आल्यानंतर आता मोदी सरकारने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारची युती संपुष्टात आल्यानंतर आता मोदी सरकारने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. राज्यपाल एन.एन. व्होरा यांचा १0 वर्षांचा कार्यकाळ २४ जून २०१८ रोजी संपत आहे. त्यांची २५ जून २००८ रोजी पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. नंतर, १३ एप्रिल २०१३ रोजी त्यांची पुन्हा या पदावर नेमणूक करण्यात आली. आता राज्यपालपदासाठी दिनेश्वर शर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे.शर्मा हे गुप्तचर विभागाचे प्रमुख होते व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे ते निकटवर्तीय आहेत. काश्मिरातील विविध गटांशी संवादासाठी यापूर्वी दिनेश्वर शर्मा यांची सरकारने मध्यस्थ म्हणून नियुक्ती झाली होती. या नेमणुकीमागेही डोवालच होते. विशेष म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील राज्यपालपदाच्या नियुक्तीपूर्वी व्होरा हेसुद्धा काश्मिरात सरकारकडून संवाद साधणारे मध्यस्थ होते.>अनुभवी नेता हवासाऊथ ब्लॉकमध्येविचार सुरू आहे की, जम्मू - काश्मीरसारख्या गुंतागुंतीच्या राज्यात राज्यपालांची निवड करताना अनुभवी राजकीय नेत्याची आवश्यकता आहे.राजकीय अस्थिरतेच्या काळात राज्यपालांचीनिवड करताना कोणतीही घाई होऊ नये, असाही विचार केला जात आहे. राज्यातील परिस्थिती रुळावर आल्यानंतर नव्या राज्यपालांची निवड केली जावी, असाही एक मतप्रवाह आहे.मोदी सरकारला राज्यात नव्याने निवडणुका नको आहेत. त्यामुळे तूर्तास सरकारकडून सावध पावले टाकली जातील.