आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा सिंहस्थासाठी फ ायदेशीर : सरंगल
By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:47:15+5:302014-05-21T00:47:15+5:30
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ देशभरातून नव्हे, तर जगभरातून भाविक नाशिकला येणार असून, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे़ अचानक येणार्या आपत्तीला कसे तोंड द्यावे यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा फ ायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले़ यशदा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिकार्यांसाठी तीनदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सरंगल बोलत होते़

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा सिंहस्थासाठी फ ायदेशीर : सरंगल
न शिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ देशभरातून नव्हे, तर जगभरातून भाविक नाशिकला येणार असून, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे़ अचानक येणार्या आपत्तीला कसे तोंड द्यावे यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा फ ायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले़ यशदा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिकार्यांसाठी तीनदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सरंगल बोलत होते़ते पुढे म्हणाले की, सिंहस्थात येणार्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागणार आहे़ त्यामुळे साहजिकच त्यांच्या जबाबदारीत वाढ होणार आहे़ ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी प्रत्येकाने सिंहस्थ कुंभमेळा समजून घेतानाच त्याचे व्यवस्थापनही समजून घेणे गरजेचे आहे़ सिंहस्थात अचानक कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवू शकते. अशावेळी ती कशा प्रकारे सोडवावी याचे नियोजन करणे गरजेचे आहे़ कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या समजून घेणे गरजेचे असून, ते पुढील दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे़एखादी घटना घडली तर ती कशी घडली, ती घडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या याचे नियोजन करणे गरजेचे आहे़ सिंहस्थात येणारे लाखो भाविक शहरात कसे येणार, त्यासाठी किती गाड्या लागणार याचे सूक्ष्म नियोजन करून ती माहिती असणे गरजेचे आहे़ गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांबरोबरच सामान्य नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे़या कालावधीत होणार्या कोणत्याही गर्दीकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहून काळजी घ्यावी लागणार आहे़ या दृष्टिकोनातून पोलीस अधिकार्यांसाठी आयोजित करण्यात आलेली ही तीनदिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा उपयुक्त ठरणार असल्याचेही सरंगल म्हणाले़ आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी यशदाचे संचालक डॉ़ संजय चहांदे, कर्नल सुपणेकर, राठोड आदिंसह अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)फ ोटो :- २० पीएचएमए ९०यशदा व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल़ समवेत डॉ़ संजय चहांदे, कर्नल सुपणेकऱ