शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

‘सीएए’ अंमलबजावणीवरून काँग्रेसमध्ये मतभेद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:43 IST

राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात केरळ आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभांनी ठराव केले असले तरी राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.  हे लक्षात घेऊन पक्षाची नक्की भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत यावर ठराव करण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी रविवारी असे म्हटले होते की, भारत हे संघराज्य आहे व त्यात राज्यांनाही काही अधिकार आहेत. केंद्राने केलेला कायदा अयोग्य वाटत असल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा राज्यांना अधिकार आहे. त्यानुसार काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ अन्वये दावे दाखल केले आहेत. त्यांचा निकाल होईपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सक्ती राज्यांवर केली जाऊ शकत नाही.मात्र, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा व स्वत: नामवंत वकील असलेल्या कपिल सिबल व सल्मान खुर्शिद या काँग्रेस नेत्यांनी मात्र याहून वेगळे मत व्यक्त केले. त्यांचे म्हणणे असे की, या कायद्याला राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे ठीक आहे; पण जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत हा कायदा लागू असणार आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. तसे न करणे हे राज्यघटनेच्या विरुद्ध होईल. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी असे संकेत दिले की, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या काँग्रेसशासित राज्यांच्या विधानसभांमध्येही या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करून घेण्याचा विचार सुरू आहे. पंजाब विधानसभेतही असा ठराव करण्यात आला असून राज्य सरकार लवकरच सर्वोच्च न्यायालयातही दावा दाखल करील, असे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी सांगितले आहे. (वृत्तसंस्था)‘एनपीआर’च्या कामात केरळचा असहकारथिरुवनंतपूरम : येत्या १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात जनगणना करणारे प्रगणक घरोघरी जातील तेव्हा त्यासोबतच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठीही (एनपीआर) माहिती गोळा करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र, केरळमध्ये फक्त जनगणनेचे काम केले जाईल व ‘एनपीआर’ची माहिती गोळा केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी सोमवारी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. जनगणना महानिरीक्षकांना औपचारिक पत्र पाठवून राज्याचा हा निर्णय कळविला जाईल, असेही विजयन म्हणाले.प. बंगाल विधानसभाही ‘सीएए’विरोधी ठराव करणारकोलकाता : केंद्र सरकारने ‘सीएए’ कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करणारा ठराव प. बंगाल विधानसभेतही येत्या काही दिवसांत मंजूर केला जाईल, असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले आणि ईशान्येकडील इतर राज्यांनीही असे ठराव करावेत, असे आवाहन केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेस