शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांमुळे दिव्यांग मुलांना तब्बल 3 तास ठेवलं उपाशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 13:16 IST

तब्बल तीन तास उपाशी पोटी राहून दिव्यांग मुलांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची वाट पाहावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - तब्बल तीन तास उपाशी पोटी राहून दिव्यांग मुलांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची वाट पाहावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जोपर्यंत राजनाथ सिंह यांचा कार्यक्रम आटोपत नाही तोपर्यंत या दिव्यांगांना दुपारचे जेवण देण्यात आले नाही. एवढंच नाही तर जेथे जेवण-पाण्याची सोय करण्यात आली होत्या, त्या खोलीतही या मुलांना जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. व्हिलचेअर मिळण्याच्या आशेपोटी आपल्या दिव्यांग मुलांना कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालकांना या प्रकारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. भूकेनं व्याकुळ झालेली मुलं येथे रडू लागली. चंदिगडमधील इंडियन रेस क्रॉस सोसायटी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

दिव्यांग मुलांना व्हिलचेअर वितरित करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बोलावण्यात आले होते. याठिकाणी एक धर्मशाळेचंही लोकार्पण करण्यात येणार होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमासाठी त्यांना सकाळी 11 वाजता पोहोचायचे होते, मात्र ते 11.35 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. राजनाथ सिंह पोहोचल्यानंतरही मुलांच्या जेवणाची समस्या कायमच होती. कार्यक्रम ठिकाणी दाखल झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी वृक्षारोपण केले. यादरम्यान त्यांनी व्हीआयपी लोकांची भेट घेतली. यानंतर दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. 

आयोजकांनी मुलांना तीन तास उपाशी ठेवण्याचं कारण धक्कादायक व तितकेच संतापजनक असेच होते. केवळ दिव्यांग मुल व  राजनाथ सिंह यांच्या फोटोसाठी मुलांना जेवणापासून थांबवण्यात आल्याचं आयोजकानं सांगितलं. सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचे दिव्यांग मुलांच्या पालकांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांना सांगितले. रिकाम्या पोटी पोहोचलेल्या मुलांसाठी काही वेळानंतर खाण्यापिण्याची सोय करण्यात येईल, असे त्यांच्या पालकांना वाटलं. मात्र राजनाथ सिंह येईपर्यंत त्यांना तब्बल तीन तास वाट पाहावी लागल्याचंही सांगत पालकांनी नाराजी व्यक्त केली.  

जेव्हा पत्रकारांनी दोन वर्षांच्या मान्याच्या रडण्यामागील कारण आई अनीताला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून मंत्र्यांची प्रतीक्षा करत आहेत, आता 11 वाजत आले आहेत, भूकेनं व्याकुळ होऊन माझी मुलगी रडत आहे. तर चार वर्षांचा दिव्यांग मुलगा लकीला सांभाळण्यात त्याचे वडील महेश शर्मा यांनी बराच त्रास सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. माझा मुलगा बेडवरही नीट झोपू शकत नाही, त्याला येथे तात्कळत बसून राहिल्यानं प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असंही महेश शर्मा यांनी सांगितले. संतापजनक बाब म्हणजे चंदिगड नगरपालिकेकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेरील बाजूस मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते, मात्र जसा गृहमंत्र्यांचा कार्यक्रम उरकला तसंच मोबाइल टॉयलेट तेथून हटवण्यात आला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा