शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांमुळे दिव्यांग मुलांना तब्बल 3 तास ठेवलं उपाशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 13:16 IST

तब्बल तीन तास उपाशी पोटी राहून दिव्यांग मुलांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची वाट पाहावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - तब्बल तीन तास उपाशी पोटी राहून दिव्यांग मुलांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची वाट पाहावी लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जोपर्यंत राजनाथ सिंह यांचा कार्यक्रम आटोपत नाही तोपर्यंत या दिव्यांगांना दुपारचे जेवण देण्यात आले नाही. एवढंच नाही तर जेथे जेवण-पाण्याची सोय करण्यात आली होत्या, त्या खोलीतही या मुलांना जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. व्हिलचेअर मिळण्याच्या आशेपोटी आपल्या दिव्यांग मुलांना कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालकांना या प्रकारामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. भूकेनं व्याकुळ झालेली मुलं येथे रडू लागली. चंदिगडमधील इंडियन रेस क्रॉस सोसायटी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

दिव्यांग मुलांना व्हिलचेअर वितरित करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बोलावण्यात आले होते. याठिकाणी एक धर्मशाळेचंही लोकार्पण करण्यात येणार होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमासाठी त्यांना सकाळी 11 वाजता पोहोचायचे होते, मात्र ते 11.35 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. राजनाथ सिंह पोहोचल्यानंतरही मुलांच्या जेवणाची समस्या कायमच होती. कार्यक्रम ठिकाणी दाखल झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी वृक्षारोपण केले. यादरम्यान त्यांनी व्हीआयपी लोकांची भेट घेतली. यानंतर दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. 

आयोजकांनी मुलांना तीन तास उपाशी ठेवण्याचं कारण धक्कादायक व तितकेच संतापजनक असेच होते. केवळ दिव्यांग मुल व  राजनाथ सिंह यांच्या फोटोसाठी मुलांना जेवणापासून थांबवण्यात आल्याचं आयोजकानं सांगितलं. सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचे दिव्यांग मुलांच्या पालकांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांना सांगितले. रिकाम्या पोटी पोहोचलेल्या मुलांसाठी काही वेळानंतर खाण्यापिण्याची सोय करण्यात येईल, असे त्यांच्या पालकांना वाटलं. मात्र राजनाथ सिंह येईपर्यंत त्यांना तब्बल तीन तास वाट पाहावी लागल्याचंही सांगत पालकांनी नाराजी व्यक्त केली.  

जेव्हा पत्रकारांनी दोन वर्षांच्या मान्याच्या रडण्यामागील कारण आई अनीताला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून मंत्र्यांची प्रतीक्षा करत आहेत, आता 11 वाजत आले आहेत, भूकेनं व्याकुळ होऊन माझी मुलगी रडत आहे. तर चार वर्षांचा दिव्यांग मुलगा लकीला सांभाळण्यात त्याचे वडील महेश शर्मा यांनी बराच त्रास सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. माझा मुलगा बेडवरही नीट झोपू शकत नाही, त्याला येथे तात्कळत बसून राहिल्यानं प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असंही महेश शर्मा यांनी सांगितले. संतापजनक बाब म्हणजे चंदिगड नगरपालिकेकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेरील बाजूस मोबाइल टॉयलेट ठेवण्यात आले होते, मात्र जसा गृहमंत्र्यांचा कार्यक्रम उरकला तसंच मोबाइल टॉयलेट तेथून हटवण्यात आला. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा