शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेद्वारे मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास, वाचणार आता ४ तास, १८ हजार कोटींच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनवाढीला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 07:44 IST

Manmad to Indore Railway: मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

नवी दिल्ली -  मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. हा प्रकल्प २०२८-२९पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईपासून इंदूरपर्यंतच्या प्रवासातील २०० किमी अंतर कमी होणार आहे. 

या प्रकल्पाद्वारे १०२ लाख मानवी दिवस इतका रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्य प्रदेशमधील महत्त्वाच्या भागांतील दळणवळणाचे प्रमाण वाढणार आहे. वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकल्पाला पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपने आता चालना दिली आहे.

मालवाहतूक हाेणार सुलभनव्या रेल्वेमार्गामुळे कृषी उत्पादने, कंटेनर, खते, लोहखनिज, सिमेंट, पेट्रोलियम, तेल आणि वंगण यांची वाहतूक करणे अधिक सुलभ होणार आहे. सुमारे २६ एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल. 

फायदा काय?महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे जोडले जातील. त्या भागात दळणवळण वाढणार.  मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल.मनमाड-इंदूरमधील नवीन रेल्वेमार्गामुळे पर्यटनवाढीलाही मदत. श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदौर परिसरातील पर्यटनस्थळांना फायदा होईल. 

इंदूरसाठी सध्या लांबचा प्रवास - मुंबईहून इंदूरला जाण्यासाठी सध्या दाेन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे, मुंबई सेंट्रल येथून पश्चिम रेल्वेने रतलाम, नागदा, उज्जैन व इंदूर असा ८२८ किलाेमीटर लांबीचा मार्ग. - दुसरा पर्याय म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून भाेपाळमार्गे इंदूर गाठणे. त्यासाठी भाेपाळ येथे ट्रेन बदलावी लागते. हे एकूण अंतर १,११० किलाेमीटर आहे.- नवा मार्ग जवळपास ६०० किलाेमीटर एवढा आहे. त्यामुळे किमान ४ तास वाचणार आहेत.

उद्योगांनाही लाभपीथमपूर ऑटो क्लस्टर हे या रेल्वेमार्गाद्वारे मुंबईजवळील जेएनपीए बंदर व अन्य राज्यांतील बंदराशी जोडले जाईल. पीथमपूर ऑटो क्लस्टरमध्ये ९० मोठे कारखाने व ६०० लहान व मध्यम श्रेणीतील उद्योग आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेश