शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिग्विजय सिंह हेच मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याचे सूत्रधार; काँग्रेस नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:56 IST

मध्य प्रदेशातून राज्यसभेवर तीन सदस्य निवडण्यात येणार आहे. यापैकी दोन जागांवर काँग्रेसचा विजय निश्चित आहे. दोनपैकी एका जागेवर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर जायचं आहे.

नवी दिल्ली - मध्ये प्रदेशातील काँग्रेसचे सरकार सुरक्षीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द कमलनाथ यांनीच या संदर्भात दावा केला आहे. येथे रंगलेले राजकीय नाट्य तब्बल 22 तासांनंतर संपुष्टात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह संकटमोचक म्हणून समोर आले. मात्र त्यांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

दिग्विजय सिंह यांच्या भूमिकेवर काँग्रेसमधूनच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. किंबहुना या सर्व राजकीय नाट्याचे सूत्रधार दिग्विजय सिंह हेच होते, असा आरोप एका काँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षरित्या केला आहे.

दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत जाण्यासाठी हे सर्व केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या सहा आमदारांपैकी दोन आमदार दिग्विजय सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. यामध्ये बिसाहूलाल सिंह आणि एंदल सिंह कंशाना या दोन आमदारांचा समावेश आहे.

कमलनाथ सरकारमधील मंत्री उमंग सिंघार यांनीच ट्विट करून दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय नाट्याला दिग्विजय सिंह हेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, कमलनाथ यांचं सरकार सुरक्षीत आहे. ही केवळ राज्यसभेत जाण्यासाठीची लढाई आहे. बाकी सर्व सुज्ञ आहेत, अस सिंघार म्हणाले.

दिग्विजय सिंह यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर तीन सदस्य निवडण्यात येणार आहे. यापैकी दोन जागांवर काँग्रेसचा विजय निश्चित आहे. दोनपैकी एका जागेवर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर जायचं आहे. कमलनाथ सरकार वाचवण्याच्या अटीवर काँग्रेस नेतृत्व दिग्विजय सिंह यांची राज्यसभेवर वर्णी लावणार असल्याचे समजते.