शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

डिजिटल व्यवहारांमध्ये 80 टक्क्यांची वाढ अपेक्षित, 2017-18 मध्ये पोहोचणार 1800 कोटीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 10:08 IST

धिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांचा डिजिटल व्यवहार करण्याकडे कल वाढला. केंद्र सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या सरकारच्या निर्णयला यश मिळत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहार 1800 कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जाते आहे. डिजिटल व्यवहार वाढण्यामागे नोटाबंदी हे प्रमुख कारण समजलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

यावर्षी ऑक्टोबरपर्यंत एक हजार कोटींपर्यंत डिजिटल व्यवहार पोहोचला होता. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये झालेल्या डिजिटल व्यवहाराइतकी ही रक्कम आहे. सूचना मंत्रालयानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 136-138 कोटी रूपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत.

मार्च-एप्रिल महिन्यात नोटाबंदीमुळे निर्माण झालेली नोटांची टंचाई हळूहळू कमी होताना दिसते आहे. तरीही डिजिटल व्यवहारात वाढ दिसून आली होती. या दोन महिन्यांत 156 कोटी रूपयांचा व्यवहार झाला होता. त्यानंतर 136-138 कोटी रूपयांचे व्यवहार झाले.

हा अहवाल संसदेच्या वित्तीय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यापासून दैनंदिन व्यवहारात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये यूपीआय-भीम, आयएमपीएस, एम वॉलेट किंवा डेबिट कार्ड यांचा वापर आधीपेक्षा जास्त होताना दिसत आहे. देशात 118 कोटी मोबाइल, इतकेच आधार क्रमांक आणि 31 कोटी जनधन खाती असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.ई-फायलिंग करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. जीएसटीअंतर्गत 72 लाख व्यापाऱ्यांनी ऑनलाईन फायलिंग केले. त्याचबरोबर 2015-16 च्या तुलनेत 2016-17 मध्ये इनकम टॅक्सचे ई-फायलिंग करणाऱ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आधारच्या माध्यमातून सरकारने जवळपास 9 अब्ज डॉलरची बचत केल्याचं या योजनेचे माजी प्रमुख नंदन नीलकेणी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. सरकारनेही  2016-17 मध्ये 57 हजार 29 कोटी रूपयांची बचत झाल्याचं म्हटलं होते. ई-टोल पेमेंटमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. 

जानेवारी 2016 मध्ये ई-टोल 88 कोटी रूपये इतके होते. तर ऑगस्ट 2017 मध्ये ते 275 कोटी रूपयेपर्यंत पोहोचले होते. पण, सप्टेंबर 2017 पर्यंत टॅग्जची संख्या 6 लाखांपर्यंतच मर्यादित राहिली. सरकारी अॅप भीम-यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारातंही वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये 101 कोटी रूपये होते. तेच ऑक्टोबर 2017 मध्ये 7057 कोटीपर्यंत पोहोचले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदीdigitalडिजिटल