शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डिजिटल व्यवहारांमध्ये 80 टक्क्यांची वाढ अपेक्षित, 2017-18 मध्ये पोहोचणार 1800 कोटीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 10:08 IST

धिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांचा डिजिटल व्यवहार करण्याकडे कल वाढला. केंद्र सरकारकडूनही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न झाला. डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या सरकारच्या निर्णयला यश मिळत असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार देशात वर्ष 2017-18 मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहार 1800 कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जाते आहे. डिजिटल व्यवहार वाढण्यामागे नोटाबंदी हे प्रमुख कारण समजलं जातं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

यावर्षी ऑक्टोबरपर्यंत एक हजार कोटींपर्यंत डिजिटल व्यवहार पोहोचला होता. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये झालेल्या डिजिटल व्यवहाराइतकी ही रक्कम आहे. सूचना मंत्रालयानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 136-138 कोटी रूपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत.

मार्च-एप्रिल महिन्यात नोटाबंदीमुळे निर्माण झालेली नोटांची टंचाई हळूहळू कमी होताना दिसते आहे. तरीही डिजिटल व्यवहारात वाढ दिसून आली होती. या दोन महिन्यांत 156 कोटी रूपयांचा व्यवहार झाला होता. त्यानंतर 136-138 कोटी रूपयांचे व्यवहार झाले.

हा अहवाल संसदेच्या वित्तीय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यापासून दैनंदिन व्यवहारात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये यूपीआय-भीम, आयएमपीएस, एम वॉलेट किंवा डेबिट कार्ड यांचा वापर आधीपेक्षा जास्त होताना दिसत आहे. देशात 118 कोटी मोबाइल, इतकेच आधार क्रमांक आणि 31 कोटी जनधन खाती असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.ई-फायलिंग करणाऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. जीएसटीअंतर्गत 72 लाख व्यापाऱ्यांनी ऑनलाईन फायलिंग केले. त्याचबरोबर 2015-16 च्या तुलनेत 2016-17 मध्ये इनकम टॅक्सचे ई-फायलिंग करणाऱ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आधारच्या माध्यमातून सरकारने जवळपास 9 अब्ज डॉलरची बचत केल्याचं या योजनेचे माजी प्रमुख नंदन नीलकेणी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. सरकारनेही  2016-17 मध्ये 57 हजार 29 कोटी रूपयांची बचत झाल्याचं म्हटलं होते. ई-टोल पेमेंटमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. 

जानेवारी 2016 मध्ये ई-टोल 88 कोटी रूपये इतके होते. तर ऑगस्ट 2017 मध्ये ते 275 कोटी रूपयेपर्यंत पोहोचले होते. पण, सप्टेंबर 2017 पर्यंत टॅग्जची संख्या 6 लाखांपर्यंतच मर्यादित राहिली. सरकारी अॅप भीम-यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारातंही वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये 101 कोटी रूपये होते. तेच ऑक्टोबर 2017 मध्ये 7057 कोटीपर्यंत पोहोचले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदीdigitalडिजिटल