शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

आधारशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडणार; कंपन्यांना नवा कायदा हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 20:03 IST

बेंगळुरु : आधार क्रमांकाच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असला तरीही खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाड्याने बाईक देणाऱ्या कंपन्या, कर्ज पुरविणाऱ्या कंपन्यांची ग्राहकाच्या व्हेरिफिकेशनसाठी आधारच्या वापराचा नवा कायदा करण्याची मागणी करू लागल्या आहेत. सरकारच्या मागे लागणारी लॉबी इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये सहभागी असलेल्या पेमेंट्स ...

बेंगळुरु : आधार क्रमांकाच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असला तरीही खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाड्याने बाईक देणाऱ्या कंपन्या, कर्ज पुरविणाऱ्या कंपन्यांची ग्राहकाच्या व्हेरिफिकेशनसाठी आधारच्या वापराचा नवा कायदा करण्याची मागणी करू लागल्या आहेत. 

सरकारच्या मागे लागणारी लॉबी इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये सहभागी असलेल्या पेमेंट्स काऊंन्सिलने (पीसीआई) आज आपल्या सदस्यांची तातडीची बैठक घेतली. यामध्ये केंद्र सरकारला असा कायदा का गरजेचा आहे, याबाबतचे प्रेझेंटेशन दाखविण्याबाबत चर्चा झाल्याचे अध्यक्षांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. 

नवा कायदा आणण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिकारी आणि मालक यावर चर्चा करत आहेत. अर्थ मंत्रालायाच्या सुत्रांनी सांगितले की, या उद्योजकांच्या गटाने अनौपचारिक चर्चा केली आहे आणि आम्हाला या अडचणीबाबत माहिती आहे. हा मुद्दा सोडविण्यात आला नाही तर आम्ही डिजिटल पेमेंटच्या जगात काही वर्षे मागे जाणार आहोत. 

भाड्याने बाईक देणारी कंपनी मेट्रो बाइक्सने आपल्या ग्राहकांचे व्हेरिफिकेशन आधारवर करण्याची यंत्रणा राबविली होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे कंपनी अडचणीत आली आहे. कारण कोणत्याही आरटीओकडे या ग्राहकांचा ऑनलाईन माहिती नाही. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सवरून त्यांचे व्हेरिफिकेशन करणे कठीण बननार आहे. यामुळे कंपनीला प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यामुळे खर्च वाढीबरोबरच जोखीमही वाढणार आहे. 

या प्रमाणेच काही डिजिटल पेमेंट किंवा अन्य काही सुविधा या यापूर्वी आधारवर केल्या जात होत्या. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे यावरही परिणाम होणार आहे. खासगी कंपन्या पॅनकार्ड ऐवजी आधारकार्ड द्वारे आपल्या ग्राहकाची ओळख पटविण्याचे काम करत होत्या. कर्ज देतानाही काही बँका, कंपन्या आधारचा वापर करत होत्या. मात्र, त्यांच्यावरही आता निर्बंध आले आहेत. 

यूआईडीएआईचे माजी टेक्नॉलॉजी प्रमुख श्रीकांत नाधामुनी  यांनी सांगितले की, यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या शोधावरही परिणाम होणार आहे. केवाइसीसाठी खर्च वाढणार आहे. व्यवस्थेवरून विश्वास उडेल आणि व्यवहाराला आणखी पैसे मोजावे लागतील. जीडीपीमध्ये 80 टक्क्यांची हिस्सेदारी ही खासगी कंपन्यांची आहे. यामध्ये छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ज्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत. त्यांना ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी आधारचा अधिकार मिळायला हवा. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयbusinessव्यवसायCentral Governmentकेंद्र सरकार