शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बंडखोरांमुळे गेहलोत यांच्यासमोर अडचणी; नेतृत्व नाराज, अध्यक्षपद निवडणुकीवर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 05:54 IST

समर्थकांनी दाद न दिल्याने निरीक्षक तसेच परतले 

आदेश रावलनवी दिल्ली : राजस्थानातीलकाँग्रेस आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून, रणकंदनामुळे त्यांनी हायकमांडची नाराजी ओढवून घेतली आहे. आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

गेहलोत हे सांगत आलेले आहेत की, माझा राजीनामा नेहमीसाठीच सोनिया गांधी यांच्याकडे ठेवून दिलेला आहे. मात्र, दिल्लीहून अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे हे निरीक्षक म्हणून जयपूरमध्ये आले तेव्हा गेहलोत समर्थक ८२ आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस सहभागी होण्यास नकार दिला. या सर्व आमदारांनी अनिश्चित काळासाठी राजीनामा देण्याची धमकीही दिली. 

अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांना एक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जयपूरला पाठविले होते. यातउल्लेख होता की, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही सोनिया गांधी यांच्यावर सोपवित आहोत. मात्र, गेहलोत समर्थक आमदारांनी न ऐकल्याने राजस्थानात गेलेले निरीक्षक विना प्रस्ताव परत आले. 

या नाट्यानंतर आता सर्वांचे लक्ष १०, जनपथकडे लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी सचिन पायलट यांच्याविरुद्ध बंडाची भूमिका घेतली आहे. अशोक गहलोत यांनाच मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावे, अशी या आमदारांची मागणी आहे.

शिस्तभंगाची कारवाई? अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली व माहिती दिली. माकन हे मंगळवारी लिखित अहवाल अध्यक्षांना देतील. नंतर गेहलोत यांचे निकटवर्तीय शांती धारीवाल, प्रताप सिंह खाचरियावास आणि महेश जोशी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. माकन म्हणाले की, समांतर बैठक घेणे हा शिस्तभंग आहे. काँग्रेसच्या ७५ वर्षांच्या इतिहासात कधीही सशर्त ठराव झालेला नाही, असेही ते म्हणाले.

शिष्टमंडळाच्या अटी

  • राजस्थानच्या मुख्यमंत्री निवडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरच घेण्यात यावा. आता लगेच नको. 
  • २०२० मधील राजकीय संकटाच्या वेळी सरकारच्या पाठीशी उभे राहिलेल्या आमदारांपैकीच कुणीतरी राजस्थानचा  मुख्यमंत्री असावा, सचिन पायलट गटातील नको. 
  • काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांनी राज्यातील एकेका आमदारांना भेटू नये. त्याऐेवजी त्यांच्यासोबत गटांमध्ये बैठका घ्याव्यात.
टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस