शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:35 IST

काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारला एका मुद्द्यावर समर्थन दिले आहे.

काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारच्या एका मुद्द्याला आपले समर्थन दिले आहे. 'पाकिस्तानसोबत कोणत्याही अडथळ्याशिवाय चर्चा करणे आता शक्य नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारख्या जखमा विसरता येणार नाहीत. आता काहीही घडलेच नाही असे वागणे खूप कठीण आहे',असं शशी थरुर यांनी म्हटले आहे. 'जेव्हा सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. अशा परिस्थितीत, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बरोबर म्हटले होते की आता पाकिस्तानशी साधेपणाने चर्चा होऊ शकत नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या या विधानाला आता शशी थरुर यांनी समर्थन दिले आहे. 

तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?

खासदार शशी थरूर म्हणाले की, पाकिस्तानातील लोकांसोबत संवाद वाढवला पाहिजे. पाकिस्तानी लोकांना अधिकाधिक व्हिसा देण्यात यावा. पाकिस्तानातून जो कोणी भारतात येतो, तो आपल्या देशाच्या प्रेमात पडतो. फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शशी थरूर म्हणाले की, संवाद थांबवणे हे देखील धोरण नाही. त्याच वेळी, पठाणकोट आणि मुंबईत पाकिस्तानने केलेले हल्ला कधीही विसरता येणार नाही, असंही थरुर म्हणाले. 

एका संसदीय समितीच्या जुन्या अहवालाचा हवाला देत थरुर म्हणाले की, जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये भारताची प्रतिमा सुधारायची असेल तर अधिक लोकांना व्हिसा द्यावा लागेल. आम्ही स्वतः म्हटले होते की पाकिस्तानवर धोरणात्मक पातळीवर विश्वास ठेवता येत नाही, पण जनतेशी संबंध मजबूत करणे आवश्यक आहे. जर भारताने असे केले तर पाकिस्तानमध्येही भारताला पाठिंबा वाढेल आणि तेथील लोक शांततेची मागणी करण्यासाठी पुढे येतील, असंही खासदार शशी थरुर म्हणाले. 

जने मुद्दे विसरुन बोलणे शक्य नाही

खासदार शशी थरूर म्हणाले की, असा एकही पाकिस्तानी नाही जो भारतात आला असेल आणि आपल्या देशाच्या प्रेमात पडला नसेल. पर्यटक, गायक, संगीतकार आणि खेळाडू देखील म्हणतात की त्यांना भारतात यायचे आहे. सध्याचे सरकार असेही म्हणते की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही म्हटले होते की, पाकिस्तानशी विनाअडथळा चर्चेची वेळ आता संपली आहे. जर कोणतेही सरकार या मुद्द्याला गांभीर्याने घेत असेल तर पाकिस्तान त्यांना चर्चा संपवण्यास भाग पाडते. चर्चेचा शेवट कायमचा जाहीर करणे शक्य नाही. पण जुने मुद्दे विसरून मित्रांसारखे बोलणे शक्य नाही, असंही खासदार शशी थरुर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी