शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:35 IST

काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारला एका मुद्द्यावर समर्थन दिले आहे.

काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांनी मोदी सरकारच्या एका मुद्द्याला आपले समर्थन दिले आहे. 'पाकिस्तानसोबत कोणत्याही अडथळ्याशिवाय चर्चा करणे आता शक्य नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारख्या जखमा विसरता येणार नाहीत. आता काहीही घडलेच नाही असे वागणे खूप कठीण आहे',असं शशी थरुर यांनी म्हटले आहे. 'जेव्हा सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. अशा परिस्थितीत, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बरोबर म्हटले होते की आता पाकिस्तानशी साधेपणाने चर्चा होऊ शकत नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या या विधानाला आता शशी थरुर यांनी समर्थन दिले आहे. 

तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?

खासदार शशी थरूर म्हणाले की, पाकिस्तानातील लोकांसोबत संवाद वाढवला पाहिजे. पाकिस्तानी लोकांना अधिकाधिक व्हिसा देण्यात यावा. पाकिस्तानातून जो कोणी भारतात येतो, तो आपल्या देशाच्या प्रेमात पडतो. फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शशी थरूर म्हणाले की, संवाद थांबवणे हे देखील धोरण नाही. त्याच वेळी, पठाणकोट आणि मुंबईत पाकिस्तानने केलेले हल्ला कधीही विसरता येणार नाही, असंही थरुर म्हणाले. 

एका संसदीय समितीच्या जुन्या अहवालाचा हवाला देत थरुर म्हणाले की, जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये भारताची प्रतिमा सुधारायची असेल तर अधिक लोकांना व्हिसा द्यावा लागेल. आम्ही स्वतः म्हटले होते की पाकिस्तानवर धोरणात्मक पातळीवर विश्वास ठेवता येत नाही, पण जनतेशी संबंध मजबूत करणे आवश्यक आहे. जर भारताने असे केले तर पाकिस्तानमध्येही भारताला पाठिंबा वाढेल आणि तेथील लोक शांततेची मागणी करण्यासाठी पुढे येतील, असंही खासदार शशी थरुर म्हणाले. 

जने मुद्दे विसरुन बोलणे शक्य नाही

खासदार शशी थरूर म्हणाले की, असा एकही पाकिस्तानी नाही जो भारतात आला असेल आणि आपल्या देशाच्या प्रेमात पडला नसेल. पर्यटक, गायक, संगीतकार आणि खेळाडू देखील म्हणतात की त्यांना भारतात यायचे आहे. सध्याचे सरकार असेही म्हणते की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही म्हटले होते की, पाकिस्तानशी विनाअडथळा चर्चेची वेळ आता संपली आहे. जर कोणतेही सरकार या मुद्द्याला गांभीर्याने घेत असेल तर पाकिस्तान त्यांना चर्चा संपवण्यास भाग पाडते. चर्चेचा शेवट कायमचा जाहीर करणे शक्य नाही. पण जुने मुद्दे विसरून मित्रांसारखे बोलणे शक्य नाही, असंही खासदार शशी थरुर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी