शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 07:50 IST

तृणमूल, सपा, आप संसदेतील आंदोलनापासून दूर. इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अदानी मुद्यावरून विरोधकांनी सोमवारी निदर्शने केली. मात्र, तृणमूल, सपा आणि आप हे पक्ष यापासून दूर राहिले. त्यामुळे इंडिया आघाडीतील मतभिन्नता समोर आली आहे. यामुळे काँग्रेसची काळजी वाढली आहे.

इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली आणि जेपीसीच्या चौकशीची मागणी करत घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह द्रमुक, राजद, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना आदी पक्षांच्या नेत्यांनी यावेळी आम्हाला न्याय हवा, अशी घोषणाबाजी केली.हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर लगेचच इंडिया आघाडीतील मतभेद सुरू झाले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नेतृत्व करावे, अशी मागणी तृणमूलने सर्वप्रथम केली. याला राष्ट्रवादी (शरद पवार), राजद, सपा आणि आप यांनी पाठिंबा दिला. मात्र, तृणमूल, सपा आणि आप हे इंडिया आघाडीच्या निदर्शनाला अनुपस्थित राहिले.

सपाच्या सूत्रांनी सांगितले की, संभल हिंसाचाराच्या वेळी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही. तथापि, सपाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव म्हणाले की, विरोधी गटात सर्व काही ठीक आहे. विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली जाऊ शकते. तृणमूल काँग्रेस, सपा, आप आणि इतरांना असे वाटते की मतदारांना प्रेरित करण्यासाठी योग्य प्रकारचे मुद्दे मांडण्यात राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत.

इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना काय वाटते?nतेजस्वी यादव (राजद) यांच्यासह इतर अनेक नेत्यांना असेही वाटते की इतर नेत्यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी दिली जावी. सपा आधीच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती.nतरीही सपा राष्ट्रीय राजकारणात इंडिया आघाडीचा भाग राहील. इंडिया आघाडीतील घटक पक्षातील मतभेद समोर आल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने जून २०२३ मध्ये या आघाडीची स्थापना करण्यात आली होती.

टॅग्स :congressकाँग्रेस