राजा रघुवंशी याच्या हत्येला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास वेगाने सुरू केला आहे. राजाची पत्नी सोनम हिने तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता. आता या प्रकरणात पोलिसांना आणखी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमच्या काही दागिन्यांची ओळख पटवली जात आहे, ज्यात दोन मंगळसूत्र सापडली आहेत. यातील दुसरे मंगळसूत्र राज कुशवाहाच्या नावाचे असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रतलाम कनेक्शन आणि जप्त केलेले दागिनेया प्रकरणाच्या तपासासाठी मध्य प्रदेशातील रतलाम शहरात एक दिवस आधीच पोलीस पोहोचले होते. सोनमने येथे काही दागिने विकल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी रतलाम येथून सोनमचे काही दागिने जप्त केले आहेत, ज्यात राजाची सोन्याची साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी राजाचा भाऊ विपिन याला हे दागिने ओळखण्यासाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान विपिनने सांगितले की, लग्नाच्या वेळी सोनमला १५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने देण्यात आले होते. विपिनच्या माहितीनुसार, राजा हनिमूनसाठी घराबाहेर पडला तेव्हा त्याने सोन्याची साखळी घातली होती. शिलाँग पोलिसांनी अलीकडेच रतलाममधून आणखी काही दागिने जप्त केले आहेत, जे सोनमच्या दागिन्यांशी जुळवले जात आहेत. विपिनच्या मदतीने या दागिन्यांची ओळख पटवली जात आहे.
दोन मंगळसूत्रांचे गूढपोलिसांनी सोनमकडून दोन मंगळसूत्र जप्त केली आहेत. पोलिसांना संशय आहे की, या दोन्ही मंगळसूत्रांपैकी एक तेच आहे जे राजाने लग्नाच्या वेळी सोनमला घातले होते. तर दुसरे मंगळसूत्र राज कुशवाहाने राजाच्या खुनानंतर सोनमला घातले असावे, अशी शक्यता पोलीस वर्तवली जात आहे. मात्र, सोनमकडे हे दुसरे मंगळसूत्र कुठून आले, याचा तपास अजूनही सुरू आहे.
या दोन मंगळसूत्रांमुळे राजा रघुवंशी हत्याकांडाला एक वेगळे वळण लागले असून, पोलीस यामागचे सत्य उलगडण्यासाठी कसून तपास करत आहेत.