शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 12:02 IST

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे

मुंबई - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या घराणेशाहीवर भाष्य केले. यावेळी, त्यांनी इंडिया आघाडीच्या पक्षातील नेत्यांवरही जोरदार प्रहार केला. त्यामध्ये, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंसह, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांच्यावरही घराणेशाहीवरुन निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे, असे म्हणत अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं. त्यावर, आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. 

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे. जय शाह यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त षटकार मारले होते का?, जय शाह यांनी सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले होते का?, जय शाह यांनी कपिल देवपेक्षा जास्त क्रिकेट खेळलं आहे का, ज्यामुळे त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव केले, असे सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, जर अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी बनले असते का, असेही राऊत यांनी म्हटले. 

घराणेशाही असेलल्या कुटुंबालाही मोठी प्रतिष्ठा असावी लागते आणि ठाकरे कुटुंबाला देशात आणि महाराष्ट्रात मोठी प्रतिष्ठा आहे. ठाकरे कुटुंब आभाळातून पडलं नाही. महाराष्ट्र, देश आणि भाजपासाठी मोठं योगदान ठाकरे कुटुंबाचं आहे. या ठाकरे कुटुंबाचा फायदा, भाजपाला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, शरद पवार यांची कन्या लोकसभेत काम करते, मग ती मुख्यमंत्री कशी होईल. शरद पवार यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यामुळेच, तुमच्याच सरकारने त्यांचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केल्याचंही राऊत यांनी अमित शाह यांना उत्तर देताना म्हटले. 

काय म्हणाले होते अमित शाह

अमित शाह यांनी म्हटले की, विरोधकांची आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेत. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं यासाठी एकत्रित आलेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलाने मुख्यमंत्री बनावं हे उद्धव ठाकरेंचं लक्ष्य आहे. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या ग्लोबल समिटमध्ये शाह यांची मुलाखत झाली. त्यात ते बोलले.  

 

टॅग्स :Jay Shahजय शाहSachin Tendulkarसचिन तेंडुलकरVirat Kohliविराट कोहलीAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊत