शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:20 IST

Air Marshal A K Bharti: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हळूहळू निवळू लागला आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अण्वस्त्र असलेल्या ठिकाणाला लक्ष्य केले, त्यामुळे हे घटल्याची चर्चा आहे. 

Operation Sindoor pakistan nuclear location: पाकिस्तानने सलग दोन रात्री हवाई हल्ले केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रहार केला. भारताने पाकिस्तानच्या तीन हवाई तळांसह इतर काही ठिकाणीही मिसाईल्स डागल्या. यात भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणाजवळही हल्ला केल्याची चर्चा आहे. त्यावर आता लष्कराच्या अधिकाऱ्यानेच अधिकृत भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अण्वस्त्र ठिकाण असलेल्या किराना हिल्स या ठिकाणी हवाई हल्ला करण्यात आला का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. 

किराना हिल्सवर भारताने हल्ला केला का?

भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांना प्रश्न विचारण्यात आला की, भारताने किराना हिल्सवर हल्ला केलाय का? 

वाचा >>"चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले

या प्रश्नाला उत्तर देताना एअर मार्शल भारती म्हणाले, "किराना हिल्समध्ये अण्वस्त्र स्टोरेज आहे, हे आम्हाला सांगण्यासाठी आभार. आम्हाला याबद्दल माहिती नव्हते. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. मग तिथेही काहीही असो अथवा नसो. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आमच्याकडून सगळी माहिती दिली गेली आहे."

किराना हिल्स का संवेदनशील आहे?

माहितीप्रमाणे सरगोधा हवाई तळापासून किराना हिल्स ८ किमी अंतरावर आहे. ७० चौरस किमी इतक्या क्षेत्रावर जमिनीखाली फॅसिलिटी केंद्र आहे. या संपूर्ण परिसरावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण आहे. 

जगाला या जागेची पहिल्यांदा माहिती १९९० मध्ये कळली. जेव्हा अमेरिकेच्या सॅटलाईट्स पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या अण्वस्त्र चाचण्या पकडल्या. अमेरिकेने यावर आक्षेप घेतल्यानंतर या अण्वस्त्र चाचण्या रद्द करण्यात आल्या. पण, तरीही अशी शंका आहे की, पाकिस्तानने या ठिकाणी अण्वस्त्र लपवून ठेवलेली आहेत. 

भारताचा पाकिस्तानातील ११ एअरबेसवर हल्ला

पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आल्यानंतर भारतानेही तसेच उत्तर दिले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ला चढवला. भारतीय लष्कराने डागलेल्या मिसाईल्समुळे या हवाई तळांचं मोठं नुकसान झालं आहे. यात सरगोधा पासून नूर खान एअर बेसचाही समावेश आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान