शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:20 IST

आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. मात्र माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे आणि यात अमेरिकेची कसलीही भूमिका नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबियो यांच्यात 1 मे रोजी पहिल्यांदा चर्चा झाली होती. त्यावेळी, भारताची इच्छा पाकिस्तानवर तगडा प्रहार करण्याची आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते.

आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. 

आधी मुनीर यांच्यासोबत चर्चा, नंतर रुबियो यांचा जयशंकर यांना फोन -भारताने 10 मे रोजी पाकिस्तानच्या मोठ्या हवाई तळावर हल्ला चढवला होता. यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमेरिकन मंत्री रुबियो यांनी सर्वात पहिले पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर, त्यांनी जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर यासंदर्भात भाष्य केले. हा कॉल कोणत्याही सामंजस्य किंवा "ऑफ-रॅम्प" संदर्भात नव्हता.

यावेळी, पाकिस्तान फायरिंग बंद करण्यास तयार आहे, यासाठी भारताची तयारी आहे का? असा प्रश्न मार्को रुबियो यांनी केला होता. याला उत्तर देत, जर त्यांनी हल्ला केला नाही, तर आम्हीही हल्ला करणार नाही. असे भारताने म्हटले होते.

'सीजफायर'संदर्भात डोनाल्ड ट्रंम्प यांनी केली होती घोषणा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'सीजफायर' संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यासंदर्भात भाष्य केले होते. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यास तयार आहेत, असे ट्रम्प यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. दरम्यान त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्याचे कौतुकही केलो होते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान