शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

Dhirubhai Ambani Birthday: 'पप्पा, तुमची खूप आठवण येत आहे...' धीरुभाई अंबानींसाठी नीता अंबानींची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:35 IST

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचणारे उद्योगपती धीरुभाई अंबानी यांची आज जयंती आहे.

Dhirubhai Ambani Birthday: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचणारे दिवंगत  उद्योगपती धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज जयंती आहे. आजही कॉर्पोरेट क्षेत्रात एंट्री घेणाऱ्या लोकांसाठी धिरुभाई एक आदर्श आहेत. खिशात 500 रुपये घेऊन मुंबई गाठलेल्या धीरुभाईंनी आपल्या क्षमतेच्या बळावर साम्राज्य उभे केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी (nita ambani ) यांनी धीरुभाईसाठी खास ओळी लिहिल्या आहेत.

नीता अंबानी यांचे सासऱ्यांसाठी खास ट्विटनीता अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ट्विटरवर धीरुभाईंचा फोटो शेअर करत लिहिले की, 'पप्पा, तुमची आज खूप आठवण येत आहे. आम्ही जेव्हा आमचे डोळे बंद करतो आणि प्रेरणेच्या शोधात असतो, तेव्हा फक्त तुम्ही दिसता.! त्या आठवणी आणि आम्हाला सक्षम करणासाठी धन्यवाद.' 

वयाच्या 17 व्या वर्षी देश सोडलाभारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धीरुभाई अंबानी यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात झाला. दहावी पूर्ण केल्यानंतरच ते पैसे कमवण्यासाठी काम करू लागले आणि वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या भावासोबत नोकरीसाठी येमेनला गेले.

रिलायन्सची सुरुवात 500 रुपयांपासून येमेनमधील एका पेट्रोल पंपावर महिना 300 रुपये पगारावर काही वर्षे काम केल्यानंतर ते भारतात परतले. यानंतर त्यांनी बाजाराची माहिती गोळा केली आणि मायानगर मुंबई गाठले. व्यवसाय करण्याच्या उद्देशाने आणि डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन ते मुंबईला पोहोचले तेव्हा त्याच्या खिशात फक्त 500 रुपये होते. या तुटपुंज्या रकमेच्या आणि खंबीर हिंमतीच्या जोरावर त्यांनी रिलायन्स कंपनी स्थापन करून भारतीय मसाले परदेशात पाठवायला सुरुवात केली आणि परदेशातून पॉलिस्टर भारतात आणायला सुरुवात केली. यातूनच रिलायन्सची सुरुवात झाली.

जुलै 2002 मध्ये निधन काही वेळातच रिलायन्सचा व्यवसाय प्रगती करू लागला आणि रिलायन्स हे नाव मोठे झाले. कंपनीच्या वेगवान वाढीसोबतच धीरूभाई अंबानी यांचे श्रीमंत होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आणि ते देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पोहोचले. धीरूभाई अंबानी यांचे 6 जुलै 2002 रोजी मुंबईतील रूग्णालयात त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिनी फुटल्याने निधन झाले. यानंतर त्यांची कंपनी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी पुढे नेली. 500 रुपयांपासून सुरू झालेली ही कंपनी आज 17 लाख कोटींहून अधिक मार्केट कॅप असलेली फर्म बनली आहे.

टॅग्स :Dhirubhai Ambaniधीरुभाई अंबानीnita ambaniनीता अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानी