शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Dhirubhai Ambani Birthday: 'पप्पा, तुमची खूप आठवण येत आहे...' धीरुभाई अंबानींसाठी नीता अंबानींची इमोशनल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:35 IST

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचणारे उद्योगपती धीरुभाई अंबानी यांची आज जयंती आहे.

Dhirubhai Ambani Birthday: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचणारे दिवंगत  उद्योगपती धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज जयंती आहे. आजही कॉर्पोरेट क्षेत्रात एंट्री घेणाऱ्या लोकांसाठी धिरुभाई एक आदर्श आहेत. खिशात 500 रुपये घेऊन मुंबई गाठलेल्या धीरुभाईंनी आपल्या क्षमतेच्या बळावर साम्राज्य उभे केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी (nita ambani ) यांनी धीरुभाईसाठी खास ओळी लिहिल्या आहेत.

नीता अंबानी यांचे सासऱ्यांसाठी खास ट्विटनीता अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ट्विटरवर धीरुभाईंचा फोटो शेअर करत लिहिले की, 'पप्पा, तुमची आज खूप आठवण येत आहे. आम्ही जेव्हा आमचे डोळे बंद करतो आणि प्रेरणेच्या शोधात असतो, तेव्हा फक्त तुम्ही दिसता.! त्या आठवणी आणि आम्हाला सक्षम करणासाठी धन्यवाद.' 

वयाच्या 17 व्या वर्षी देश सोडलाभारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या धीरुभाई अंबानी यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात झाला. दहावी पूर्ण केल्यानंतरच ते पैसे कमवण्यासाठी काम करू लागले आणि वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या भावासोबत नोकरीसाठी येमेनला गेले.

रिलायन्सची सुरुवात 500 रुपयांपासून येमेनमधील एका पेट्रोल पंपावर महिना 300 रुपये पगारावर काही वर्षे काम केल्यानंतर ते भारतात परतले. यानंतर त्यांनी बाजाराची माहिती गोळा केली आणि मायानगर मुंबई गाठले. व्यवसाय करण्याच्या उद्देशाने आणि डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन ते मुंबईला पोहोचले तेव्हा त्याच्या खिशात फक्त 500 रुपये होते. या तुटपुंज्या रकमेच्या आणि खंबीर हिंमतीच्या जोरावर त्यांनी रिलायन्स कंपनी स्थापन करून भारतीय मसाले परदेशात पाठवायला सुरुवात केली आणि परदेशातून पॉलिस्टर भारतात आणायला सुरुवात केली. यातूनच रिलायन्सची सुरुवात झाली.

जुलै 2002 मध्ये निधन काही वेळातच रिलायन्सचा व्यवसाय प्रगती करू लागला आणि रिलायन्स हे नाव मोठे झाले. कंपनीच्या वेगवान वाढीसोबतच धीरूभाई अंबानी यांचे श्रीमंत होण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आणि ते देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पोहोचले. धीरूभाई अंबानी यांचे 6 जुलै 2002 रोजी मुंबईतील रूग्णालयात त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिनी फुटल्याने निधन झाले. यानंतर त्यांची कंपनी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी पुढे नेली. 500 रुपयांपासून सुरू झालेली ही कंपनी आज 17 लाख कोटींहून अधिक मार्केट कॅप असलेली फर्म बनली आहे.

टॅग्स :Dhirubhai Ambaniधीरुभाई अंबानीnita ambaniनीता अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानी