शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चीनला भस्म करण्याच्या आव्हानावर धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले, मौर्य यांना अशा शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:53 IST

धीरेंद्र कृष्ण शास्त्री 'हिंदू राष्ट्रा'संदर्भात बोलताना म्हणाले, सर्वच सनातन लोक याला समर्थन करत आहेत. 'ज्यांच्या शरिरात सनातनी रक्त असेल, ते खुल्या मनाने याला पाठिंबा देतील, बोलतील आणि करूनच राहतील. ज्याच्या रक्तातच समस्या असेल, ते बोलले नाही तरी फरक पडणार नाही.

'हिंदू राष्ट्रा'साठी महायज्ञात व्यस्त असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी, ही एक क्रांती असल्याचे म्हणत, यावर लवकरच संसदेतही काही होणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले ज्यांच्या रक्तात सनातन आहे, ते यासंदर्भात मागणी करतील. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या आव्हानालाही थेट उत्तर दिले. "जर एवढी शक्त असेल तर त्यांनी चीनला भस्म करावे", असे स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले होते.

एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री 'हिंदू राष्ट्रा'संदर्भात बोलताना म्हणाले, सर्वच सनातन लोक याला समर्थन करत आहेत. 'ज्यांच्या शरिरात सनातनी रक्त असेल, ते खुल्या मनाने याला पाठिंबा देतील, बोलतील आणि करूनच राहतील. ज्याच्या रक्तातच समस्या असेल, ते बोलले नाही तरी फरक पडणार नाही. ते म्हणाले, भारत हिंदू राष्ट्र घोषित होत आहे. क्रांती होत आहे. लवकरच या संसदेत काही तरी होणार आहे. 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षीतच लाखो अनुयायी झाले आहेत. त्यांना स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिलेल्या आव्हानासंदर्भात विचारले असता, 'आम्ही सनातन धर्माचे वाहक आहोत आणि आमच्या धर्मात दडपशाही किंवा हिंसा शिकवली जात नाही. शिक्षण देणे हे आपल्या धर्माचे मुख्य धोरण आहे. त्यांना असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःच जाऊन आधी प्रयत्न करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य? -रामचरित मानस संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतांच्या निशाण्यावर आलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी नुकतेच, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला होता. सोनभद्र येथे पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले होते, जर बागेश्वर धाम बाबांकडे शक्ती आहे, तर त्यांनी रोजच्या रोज भारताला त्रास देणाऱ्या चीनला बसल्या बसल्या भस्म करावे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी