शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

“राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली का? केवळ मतांसाठी वापर”; काँग्रेस नेत्याची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 20:01 IST

Congress Vs BJP: भाजपाने देशासाठी काही केलेले नाही. गरिबांना फायदा झाला, असा एकही कार्यक्रम १० वर्षांत भाजपाने घेतला नाही, अशी टीका काँग्रेस नेत्याने केली आहे.

Congress Vs BJP: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. भाविकांना सुलभतेने रामदर्शन घेता यावे, यासाठी मंदिर ट्रस्ट प्रयत्नशील आहे. मात्र, राम मंदिरावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि मंत्री संतोष लाड यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष लाड यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. राम मंदिराच्या उभारणीवर आक्षेप नाही. पण ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले गेले आहे, ती जागा योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने सूचित केलेल्या जागेवर राम मंदिर बांधलेले नाही. आताचे राम मंदिर वेगळ्या जागी बांधले आहे. राम मंदिराचे केवळ ४० टक्के बांधकाम झाले आहे. राम मंदिर हे राजकीय इच्छाशक्तीमुळे बांधले गेले आहे. राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली आहे का? राम मंदिराच्या नावावर मते का मागता? अशी विचारणा कर्नाटक काँग्रेसचे मंत्री संतोष लाड यांनी भाजपाला केली आहे. 

देशात दहा वर्षांपासून हुकूमशाही सुरू

देशात दहा वर्षांपासून हुकूमशाही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत जी काही उद्घाटने झाली, ती फक्त मोदींनीच केली. देश उद्ध्वस्त झाला आहे. गरिबांना फायदा झाला, असा एकही कार्यक्रम गेल्या दहा वर्षांत झालेला नाही. दहा वर्षात त्यांची कामगिरी काय? पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले का? निवडणुका आल्या की अजेंडा ठरवतात. सत्तेचा गैरवापर होता कामा नये, या शब्दांत काँग्रेस नेते लाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

भाजपाने देशासाठी काहीही केलेले नाही

केवळ राम मंदिर, नितीश कुमार, पराभूत कमलनाथ यांना घेऊन भाजपा काय करणार? कोणत्याही हिंदूला याचा फायदा झालेला नाही. भाजपने काही केलेले नाही. गॅरंटीच्या मागे जाऊन मतदान झाले, तर भाजप जिंकणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर भाजपा जिंकणार नाही. म्हणूनच राम, रहीम असे मुद्दे पुढे आणले जात आहेत. पुढील १०० दिवस फक्त विकासावर चर्चा करावी, असे आव्हान लाड यांनी भाजपाला दिले आहे. तसेच भाजपा केवळ दिखाऊपणा करत आहे. भाजपाने देशासाठी काहीही केलेले नाही. देश कर्जात बुडाला आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच्या भाषणाचे व्हिडिओ आहेत, ते भाजपवाल्यांनी ऐकावे, असा खोचक सल्लाही लाड यांनी दिला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरKarnatakकर्नाटकBJPभाजपा