शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:48 IST

उत्तराखंडमधील आलेल्या भयंकर जलप्रलयाने अवघा देश हादरला. केदारनाथमध्ये झालेल्या घटनेच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या. १२३० इतक्या उंचीवरून आलेल्या पाणी मातीच्या लोंढ्यात धरालीमधील अनेक घरे गाडली गेली. 

निसर्गाच्या प्रकोपाचं एक भयंकर रुप मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बघायला मिळालं. ढगफुटी झाली आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरात निम्मे धराली गाव मातीखाली गाडले गेले. धरालीबरोबरच सुखी टॉप जवळही ढगफुटी झाली. धरालीमध्ये ज्या ठिकाणी ढगफुटी झाली, तिथून गंगोत्री धाम फक्त १८ किमी अंतरावर आहे. तर भारतीय लष्कराच्या हर्षिल कॅम्पपासून हे ठिकाण फक्त ४ किमी दूर आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ढगफुटीनंतर धरालीमध्ये झालेल्या प्रलयाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ढगफुटी झाल्यानंतर खीर गंगा ओढ्याला पूर आला आणि अवघ्या ३४ सेकंदात अचानक आलेल्या पाणी आणि मातीच्या पुरात गावीतील घरे गाडली गेली. 

जो मलबा खीर गंगेच्या पात्रातून आला होता, तो भगीरथी नदीच्या पात्रात मिळाला. भगीरथी नदीच्या पात्रात जाताना हा मलबा निम्म्यातील धरातील घरांचा घास घेऊन गेला. पुराचे पाणी बऱ्याच अंतरावरून आणि उंचीवरून आले, त्यामुळे त्याला प्रचंड वेग होता. धराली गाव नदीच्या काठावर आहे. काठाच्या दोन्ही बाजूंना घरे होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते थेट गावात घुसले. 

भगीरथी नदीच्या काठावर धराली, हर्षिल, आणि बेली अशा छोट्या आकारातील गावे आहेत. हर्षिलमध्ये लष्कराची छावणी आहे, त्यामुळे धरालीमध्ये शोध कार्य सुरू करण्यात मदत झाली. 

धराली गाव समुद्र सपाटीपासून १२६०० फूट उंचीवर आहे. पाणी आणि गाळ ४३ किमी प्रतितास या वेगाने १२३० फूट इतक्या उंचीवरून खाली आला होता आणि गावात शिरला. खीर गंगा ओढ्याला गावाजवळच वळण आहे, त्यामुळे गावातील घरांचे जास्त नुकसान झाले. 

टॅग्स :floodपूरRainपाऊसUttarakhandउत्तराखंडDeathमृत्यू