शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:48 IST

उत्तराखंडमधील आलेल्या भयंकर जलप्रलयाने अवघा देश हादरला. केदारनाथमध्ये झालेल्या घटनेच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या. १२३० इतक्या उंचीवरून आलेल्या पाणी मातीच्या लोंढ्यात धरालीमधील अनेक घरे गाडली गेली. 

निसर्गाच्या प्रकोपाचं एक भयंकर रुप मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बघायला मिळालं. ढगफुटी झाली आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरात निम्मे धराली गाव मातीखाली गाडले गेले. धरालीबरोबरच सुखी टॉप जवळही ढगफुटी झाली. धरालीमध्ये ज्या ठिकाणी ढगफुटी झाली, तिथून गंगोत्री धाम फक्त १८ किमी अंतरावर आहे. तर भारतीय लष्कराच्या हर्षिल कॅम्पपासून हे ठिकाण फक्त ४ किमी दूर आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ढगफुटीनंतर धरालीमध्ये झालेल्या प्रलयाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ढगफुटी झाल्यानंतर खीर गंगा ओढ्याला पूर आला आणि अवघ्या ३४ सेकंदात अचानक आलेल्या पाणी आणि मातीच्या पुरात गावीतील घरे गाडली गेली. 

जो मलबा खीर गंगेच्या पात्रातून आला होता, तो भगीरथी नदीच्या पात्रात मिळाला. भगीरथी नदीच्या पात्रात जाताना हा मलबा निम्म्यातील धरातील घरांचा घास घेऊन गेला. पुराचे पाणी बऱ्याच अंतरावरून आणि उंचीवरून आले, त्यामुळे त्याला प्रचंड वेग होता. धराली गाव नदीच्या काठावर आहे. काठाच्या दोन्ही बाजूंना घरे होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते थेट गावात घुसले. 

भगीरथी नदीच्या काठावर धराली, हर्षिल, आणि बेली अशा छोट्या आकारातील गावे आहेत. हर्षिलमध्ये लष्कराची छावणी आहे, त्यामुळे धरालीमध्ये शोध कार्य सुरू करण्यात मदत झाली. 

धराली गाव समुद्र सपाटीपासून १२६०० फूट उंचीवर आहे. पाणी आणि गाळ ४३ किमी प्रतितास या वेगाने १२३० फूट इतक्या उंचीवरून खाली आला होता आणि गावात शिरला. खीर गंगा ओढ्याला गावाजवळच वळण आहे, त्यामुळे गावातील घरांचे जास्त नुकसान झाले. 

टॅग्स :floodपूरRainपाऊसUttarakhandउत्तराखंडDeathमृत्यू