शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:28 IST

Operation Sindoor: पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. भारतीय सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच ठेवायला हवी, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे.

Operation Sindoor: भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. भारताने चहुबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भारताच्या तिन्ही दलांकडून सडेतोड उत्तर दिले जात असून, दुसरीकडे भारत जागतिक स्तरावर राजनैतिक चर्चेतून आपली भूमिका ठामपणे मांडत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिका, युरोपीय युनियनसह अन्य देशांशी संवाद साधत भारताची बाजू स्पष्ट केली आहे. यातच गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजा केली जात असून, भारतीय सैन्याला बळ मिळावे, पाकिस्तानचा खात्मा व्हावा, असे साकडे भाविकांकडून घातले जात आहे. 

पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी कामाख्या देवी भारतीय सैन्यला बळ देवो आणि यश देवो. पाकिस्तान सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. पाकिस्तानवर किंचितही विश्वास नाही. भारत सरकार आणि भारतीय सैन्याला एवढेच सांगू इच्छितो की, पाकिस्तानला संपवून टाका. आतापर्यंत भारताने खूप सहन केले आहे. पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. भारतीय नागरिक म्हणून सांगतो की, पाकिस्तानशी प्रेमाने वागायची काही गरज नाही. संपवून टाका, अशी प्रतिक्रिया कामाख्या मंदिरात आलेल्या जयकुमार दास यांनी व्यक्त दिली. 

दहशतवाद संपवण्यासाठी कामाख्या देवी भारतीय सैन्याला शक्ती देवो

दहशतवाद संपवण्यासाठी कामाख्या देवी भारतीय सैन्याला शक्ती देवो. भारतीय सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच ठेवायला हवी. आम्ही भारतीय सैन्याला सलाम करतो. जय हिंद, असे दिल्लीचे रहिवासी आणि कामाख्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शंतनू रॉय यांनी म्हटले आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबासोबत सहवेदना व्यक्त करतो. या कठीण काळातून जायची देवी त्यांना शक्ती देवो. देश चालवताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. तसेच दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्यांना देवी शक्ती देवो आणि यात त्यांना विजय प्राप्त होवो, असे सुश्मिता रॉय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. तसेच, सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली एक गॅस पाइपलाइन उडवून दिली आहे. एकीकडे भारतीय सैन्य पाकिस्तावर हल्ले करत आहे, तर दुसरीकडे बलोच आर्मीकडून पाकला दणक्यावर दणके बसत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकguwahati-pcगौहती