शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील महत्त्व वाढलं; शपथविधी सोहळ्यात मानाचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:57 IST

महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जाते. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी संख्याबळ नसतानाही भाजपाला मोठा विजय मिळवून दिला.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीतील महत्त्व वाढल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रीय राजधानीतील सेंट्रल हॉलमध्ये नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांनी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींपासून समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. 

या शपथविधी सोहळ्याचा एक फोटो समोर आला. ज्या राज्याचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आले होते. फडणवीसांना मिळालेले हे स्थान विशेष होतं कारण देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्यात तिसऱ्या रांगेत बसावं लागलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानाचं स्थान देण्यात आले तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिसऱ्या रांगेत बसले होते. त्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या यादीत फडणवीसांची ताकद वाढली आहे. सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे भाजपाचा चेहरा म्हणून उदयास आले आहेत. 

महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना दिले जाते. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी संख्याबळ नसतानाही भाजपाला मोठा विजय मिळवून दिला. राष्ट्रीय स्तरावर, बिहार आणि गोवा विधानसभा निवडणुकीत जेथे ते पक्षाचे निरीक्षक होते. याठिकाणीही फडणवीसांनी उत्तम कामगिरी केली. राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सातत्याने विजय मिळवत आहे.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाली. ती फार काळ टिकणार नाही आणि ती अखेर कोसळेल, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासूनच वर्तवला होता. त्यांचा अंदाज अडीच वर्षांनी खरा ठरला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. या राजकीय भूकंपाचं श्रेय राजकीय निरीक्षक आणि तज्ज्ञांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पाहिले. मात्र अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीसांनी सरकारचा भाग न राहता बाहेरून मदत करण्याचे पसंत केले. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या, म्हणजे भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू