शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

विकासाची बुलेट ट्रेन - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 05:31 IST

महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय आहे, असा सवाल विचारला जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटातच मिळाली आहे, हे लक्षात घ्यावे. ही ख-या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ साबरमती येथे पार पडल्यानंतर ते सभेत बोलत होते.

अहमदाबाद : महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय आहे, असा सवाल विचारला जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटातच मिळाली आहे, हे लक्षात घ्यावे. ही ख-या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ साबरमती येथे पार पडल्यानंतर ते सभेत बोलत होते.बुलेट ट्रेनसाठी १ लाख १0 हजार कोटी रुपये खर्च येणार असला तरी त्यासाठी ८८ हजार कोटी रुपयांचे कर्ज भारताला 0.0१ टक्के इतक्या कमी व्याजाने म्हणजे जणू शून्य टक्के दरानेच मिळते आहे. इतक्या कमी टक्क्याने एवढे मोठे कर्ज कुठेही मिळणार नाही, याचा उल्लेख करीत पंतप्रधानांनी त्यासाठी शिंजो आबे यांचे आभारही मानले. तसेच २0२२ साली या ट्रेनच्या उद्घाटनाची संधी मला व आबे यांनाच मिळेल, अशी आशाही व्यक्त करीत, या ट्रेनमुळे भारत व जपानमधील मैत्री अधिक घट्ट होईल, असे ते म्हणाले.बुलेट ट्रेन १२ स्टेशनांवर थांबत सुमारे पावणेतीन तासांत मुंबई ते अहमदाबाद हे अंतर पूर्ण करेल. अहमदाबादहून विमानाने मुंबईला जायचे ठरविले तर दोन्ही विमानतळांवरील सारे उपचार पुरे करेपर्यंत जितका वेळ लागतो, त्यापेक्षा हा वेळ कमी असेल. म्हणजेच बुलेट ट्रेनमुळे वेळ वाचेल, रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल, त्यामुळे प्रदूषण कमी होईल. या सर्वांपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ही दोन शहरे ‘सिंगल इकॉनॉमिक झोन’ म्हणून विकसित होऊ न दोन्ही राज्यांच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल, असेही ते म्हणाले.मेक इन इंडियाला मजबुतीरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेला मजबुती मिळेल आणि लोकांसाठी रोजगार उपलब्ध होतील, असा दावा करून, ही बुलेट ट्रेन जपान आणि भारतातील लोकांमधील बंधुत्वाचे प्रतीक आहे, असे सांगितले.ऐतिहासिक दिवस - फडणवीसमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्र वा गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आहे. या बुलेट ट्रेनमुळे आधुनिक भारताचा पाया रचला जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही या वेळी भाषण झाले.जय जपान, जय इंडिया - शिंजो आबेशंजो आबे यांनी भाषणाची सुरुवात ‘नमस्कार’ने केली. जपानचा 'जे' व इंडियाचा 'आय' एकत्र केल्यास 'जय' शब्द निर्माण होतो, असे सांगून त्यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला.आपणास गुजरात हे राज्य आणि येथील पाहुणचार खूप आवडला, असे सांगतानाच शिंजो आबे यांनी पुढच्या वेळी मी बुलेट ट्रेनमधून नरेंद्र मोदींसोबत प्रवास करेन, असे नमूद केले. त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट 'धन्यवाद'ने केली.२०१३ मध्येच यूपीएने केला होता करार - मल्लिकार्जुन खरगेबुलेट ट्रेनसाठी २०१३ मध्येच जपानशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने करार केला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीत लाभ व्हावा यासाठीच मोदी यांनी बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनासाठी ही वेळ निवडली. त्यांना यातून राजकीय लाभ मिळवायचा आहे.मोदी या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कर्तृत्व स्वत:चे म्हणून सांगत आहेत. यूपीने जपानशी सात अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यानुसार दिल्ली-मुंबई आर्थिक मार्ग केला जाणार होता व त्यातच बुलेट ट्रेनचा समावेश होता. या करारात मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गांचाही तपशील होता.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGujaratगुजरात