शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विकास हाच राष्ट्रीय राजकारणाचा आधार; एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 07:11 IST

एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

नवी दिल्ली : बिहार आणि अन्य पोटनिवडणुकीच्या निकालातून अगदी स्पष्ट झाले की, जनता आता विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच पाठिंबा देतील. २१ व्या शतकाातील राष्ट्रीय राजकारणाचा आधार विकास हाच असेल, अशी खूणगाठ जनतेनेबांधली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  बिहार विधानसभा निवडणुकीसह विविध राज्यातील पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल मतदार, कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अबोल मतदार असलेल्या देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व महिलांनी भाजपला पाठिंबा दिला. लोकशाहीमार्गाने भाजपशी मुकाबला न करु शकणाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्याचा मार्ग पत्करला. हत्येचा हा खेळ लोकशाहीत चालू शकत नाही. गरीब, दलित आणि वंचित घटक आपले प्रतिनिधीत्व म्हणून फक्त भाजपकडे पाहतात.

भाजपला समाजातील प्रत्येक घटकांच्या गरजांची जाणीव आहे. घराणेशाही असलेल्या राजकीय पक्षांचा लोकशाहीला मोठा धोका आहे. एक राष्ट्रीय पक्षही घराणेशाहीत अडकला. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हाच भाजपचा एकमेव मंत्र आहे. भाजपवर पुन्हा विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिले. तसेच निवडणुका शांततेत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोग, सुरक्षा दले आणि प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी