सध्या संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, कोट्यवधींचे गेलेले रोजगार, पगारकपात अशी संकटांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे २०२० हे वर्षच चिंता वाढवणारं ठरलं. हे वर्ष संपण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत. मात्र तरीही संकटं काही संपणार नाहीत, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत भारतावर आणखी संकटं येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच पूर्ण हिमालय क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतील, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
२०२० च्या अखेरपर्यंत भारतात भयानक भूकंप होणार; वैज्ञानिकांकडून धोक्याचा इशारा
By कुणाल गवाणकर | Updated: October 28, 2020 08:36 IST