शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

लक्षद्वीप समुहातील जैवसमृद्ध बेट विदारणामुळे झाले नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:03 IST

अरबी समुद्रातील लक्षद्वीप समुहातील पराली 1 हे बेट सततच्या विदारणामुळे संपुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटावर मानवी वस्ती नसली तरी हे प्रवाळ द्वीप जैवविविधतेने समृद्ध होते.

ठळक मुद्दे 1968 साली हे बेट 0.032 चौकिमी इतक्या आकारमानाचे होते तसेच ते बेट बंगारम प्रवाळद्विपाचा एक भाग होते आता ते 100 टक्के पाण्याखाली गेले आहे.

मुंबई, दि.8- अरबी समुद्रातील लक्षद्वीप समुहातील पराली 1 हे बेट सततच्या विदारणामुळे संपुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटावर मानवी वस्ती नसली तरी हे प्रवाळ द्वीप जैवविविधतेने समृद्ध होते. आर.एम. हिदायतुल्ला यांनी केलेल्या अभ्यासातून हे बेट आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 1968 साली हे बेट 0.032 चौकिमी इतक्या आकारमानाचे होते तसेच ते बेट बंगारम प्रवाळद्विपाचा एक भाग होते असे हिदायतुल्ला यांनी आपल्या अभ्यास अहवालात लिहिले आहे. आता ते 100 टक्के पाण्याखाली गेले आहे.

हिदायतुल्ला हे लक्षद्वीपच्या अॅंड्रोथ येथील राहणारे असून जुलै महिन्यामध्ये त्यांनी कालिकत विद्यापिठात पी.एचडी पदवी संपादित केली आहे. सागरी लाटांच्या विदारणामुळे लक्षद्वीपमधील जैवसमृद्ध बेटांवर होणारा परिणाम असा त्यांच्या अभ्यासाचा विषयच आहे. हिदायतुल्ला यांनी सागरी विदारणाचा अभ्यास करण्यासाठी लक्षद्वीपमधील बंगारम, थिन्नकारा,पराली1, पराली2, पराली 3 या बेटांती निवड केली होती. यामध्ये या पाचही बेटांवर सागरी विदारणाचा मोठा परिणाम होत असल्याचे हिदायतुल्ला यांच्या लक्षात आले. तसेच पराली हे बेट संपुर्ण पाण्याखाली गेल्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले. सागरी विदारणाचा बेटांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांनी रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचाही वापर केला.

या अभ्यासामधून पुढील विदारण प्रक्रिया रोखण्यासाठी आताच उपाय शोधण्याची गरज असल्याचे लक्षात आले असे हिदायतुल्ला यांनी म्हटले आहे. या बेटांचे किनारे वाचवण्यासाठी मॅन्ग्रोव्ह तसेच इतर उपायांची योजना कितपत यशस्वी होईल याचाही विचार केला पाहिजे असे हिदायतुल्ला यांनी म्हटले आहे. या अभ्यासासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे सी.सी. हरिलाल यांनी परळी 1 बेट पाण्याखाली जात असल्याचे 2011 साली बंगारामला दिलेल्या भेटीत आपल्या लक्षात आले होते असे म्हटले आहे.

टॅग्स :Indiaभारत